शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

भीषण पाणीटंचाईचा फळबागांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:20 IST

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे.

वाशिम : राज्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोला जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा या पश्चिम वºहाडातील इतर दोन जिल्ह्यांमध्येही वाढते तापमान आणि भीषण पाणीटंचाई या दुहेरी समस्यांमुळे फळबागांना जबर फटका बसत आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत.विपरित हवामान, पाण्याची कमतरता, अद्ययावत तंत्रज्ञानाविषयीच्या मार्गदर्शनाचा अभाव आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम वºहाडात फळबागांच्या क्षेत्रात कमालीची घट आली आहे. अशाही स्थितीत काही शेतकऱ्यांनी तग धरून फळबागा जीवंत ठेवण्याची केविलवाणी धडपड चालविली. मात्र, गतवर्षी पर्जन्यमानात झालेली घट, त्यामुळे यंदा उद्भवलेली भीषण पाणीटंचाई आणि तापमानाने गाठलेल्या उच्चांकामुळे आहे, त्या फळबागा देखील करपण्याच्या मार्गाप्रत पोहचल्या आहेत.फळबाग लागवड योजनेतील अनुदान अपुरे!फळबागांचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने अंमलात आणलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचाही अपेक्षित फायदा झालेला नाही. या योजनेंतर्गत तालुकानिहाय केवळ २४ लाख रुपये अनुदान मंजूर असून अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कितीतरी पटीने अधिक राहत आहे. त्यामुळे ही योजना जणू मृगजळ ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच!शेतांमध्ये फळपिकांची लागवड साधारणत: पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. मात्र, प्रतिकुल परिस्थितीमुळे फळबागांनी दिलेला दगा आणि यंदा उद्भवलेल्या तीव्र स्वरूपातील पाणीटंचाईमुळे आगामी काळात फळबाग क्षेत्रात वाढ होणे अशक्यच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीdroughtदुष्काळFarmerशेतकरीwater scarcityपाणी टंचाई