ग्रामीण भागात रात्रीचा वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: May 17, 2014 23:12 IST2014-05-17T21:27:05+5:302014-05-17T23:12:49+5:30
मानोरा तालुक्यातील नागरिकांना अवेळी खंडित होणार्या विद्युत पुरवठय़ामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागात रात्रीचा वीजपुरवठा खंडित
मानोरा : विजेच्या नियमित वीज भारनियमन व्यतिरिक्त होणारे अतिरिक्त भारनियमन व अवेळी खंडित होणार्या विद्युत पुरवठय़ामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी ३ वाजतापासून भारनियमन सुरू झाले की रात्रीचे १२ वाजता संपते. त्यातच रात्री १२ वाजता वीज भारनियमन संपताच विद्युतपुरवठा सुरळीत झाला की पुन्हा विद्युत पुरवठा खंडित होत ग्रामीण भागातील अतिरिक्त भारनियमन कमी करून तेथील विद्युतपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.