शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची प्रभावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:43 PM

लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने गुरूवार, २३ आॅगस्टपासून ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ झाला. याअंतर्गत नेमणूक करण्यात आलेल्या ११ नोडल अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी जनजागृती केली जात आहे. लवकरच कलापथक आणि रथयात्रेव्दारा जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक पडताळणी समिती गठीत करण्यात येऊन आली असून फेरपडताळणी देखील केली जाणार आहे. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीने गावस्तरावर कशाप्रकारे पडताळणी करायची, याबाबत मार्गदर्शन करण्यासह विस्तार अधिकारी (पंचायत) हे पडताळणी प्रक्रिया सुरू असताना सनियंत्रण करणार आहेत. प्राथमिक पडताळणी तपासणी समितीमध्ये केंद्र प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, संबंधित ग्रामपंचायतींमधील एक अंगणवाडी सेविका, एक मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी, एक स्वच्छाग्रही, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, आशा सेविका, महिला बचत गटाची एक सदस्य, जलसुरक्षक आदींपैकी सहा सदस्य असणार आहेत. दरम्यान, या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृतीस प्रारंभ झाला असून लवकरच कलापथक आणि रथयात्रेच्या माध्यमातूनही स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. यासाठी वाशिमसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून ११ नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान