शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाचे पुन्हा तांडव; शेकडो एकरातील सोयाबीनला फटका, शेतकरी रडकुंडीस 

By दादाराव गायकवाड | Updated: October 18, 2022 18:02 IST

वाशिम जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

वाशिम: जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरूच आहे. चालू आठवड्यात दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत तास दोन तास पाऊस धो-धो कोसळत राहिला. या पावसामुळे शेकडो एकरातील सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावल्याने शेतकरी रडकुंडीस येत असल्याचे दिसते. जिल्ह्यात जुलैपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिके होत्याची नव्हती झाली आहेत. जुलै ते सप्टेंबरदरम्यान वारंवार अतिवृष्टी झाल्याने पिकांना फटका बसला. त्यातून वाचलेले सोयाबीनचे पीक काढण्याच्या तयारीत शेतकरी असतानाच ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा धडाका लावला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन नेस्तनाबूद झाले. 

मागील दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या कापणी आणि काढणीचा वेग वाढवला. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवल्या, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेले सोयाबीन पडून होते. अशात मंगळवारी सकाळी १० वाजतापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. यात कापणी करून ठेवलेले शेकडो एकरातील सोयाबीन पाण्यात भिजले. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने आता या सोयाबीनमधून कोणतेही उत्पादन होण्याची शक्यताही उरली नसल्याने शेतकरी रडकुंडीस आले आहेत. कापणी, काढणी करणाऱ्यांची तारांबळमंगळवारी शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून लावलेल्या सुड्यातील सोयाबीनची मळणी यंत्रणातून काढणी सुरू केली होती, तर अनेक शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून कापणी सुरू केली होती; परंतु पावसाने सकाळीच हजेरी लावल्याने कापणी आणि काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात सोयाबीन पाण्यात भिजलेच शिवाय मजुरांची मजुरीही अंगावर आल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरी