शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद

By दिनेश पठाडे | Updated: February 16, 2024 18:17 IST

प्रवाशांची गैरसोय; आंदोलनाच्या स्थितीवर प्रशासनाचे लक्ष.

दिनेश पठाडे, वाशिम : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे. शासनाकडून निर्णय होत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको, उपोषण, कडकडीत बंद पुकारला जात आहे. आंदोलनादरम्यान एसटी बसचे नुकसान होण्याची भीती असल्याने महामंडळाने सावध भूमिका घेत, हिंगोलीमार्गे परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या सर्व बस शुक्रवारी (दि.१६) बंद केल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १० तारखेपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या उपोषणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मराठा समाज बांधवांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापूर जवळ तरुणांनी बस पेटवून दिली, तसेच दोन बसवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाला मिळतात. सकाळी हिंगोलीपर्यंत सुरू असलेली बससेवादेखील दुपारनंतर बंद करण्यात आली. हिंगोली, परभणी, नांदेड व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील आंदोलनाची स्थिती पाहूनच वेळेवर बस सोडण्याचा निर्णय आगार प्रशासनाकडून घेतला जाणार आहे. दरम्यान, परभणी, हिंगोली, नांदेडकडे जाणाऱ्या बस बंद असल्याची चर्चा शुक्रवारी सकाळपासूनच होती. त्यामुळे अनेकांनी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दिली.सिंदखेडराजापर्यंतच धावल्या बस

वाशिमवरून मराठवाड्यात जाणाऱ्या बस शुक्रवारी जवळपास बंद करण्यात आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणेकडे जाणाऱ्या बसदेखील सकाळपासूनच बंद होत्या. या शहराकडे जाणाऱ्या बस वाशिम आगारातून सिंदखेडराजापर्यंतच सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला.

टॅग्स :washimवाशिम