फौजदारी कारवाईच्या धास्तीने सक्तीच्या रजेचा पवित्रा!
By Admin | Updated: February 10, 2016 02:12 IST2016-02-10T02:12:39+5:302016-02-10T02:12:39+5:30
प्रशासनाच्या गळचेप्या धोरणाला अभियंते कंटाळले.

फौजदारी कारवाईच्या धास्तीने सक्तीच्या रजेचा पवित्रा!
सुनील काकडे /वाशिम: धडक सिंचन आणि नरेगांतर्गत मंजूर योजनेतून करण्यात येणार्या विहिरींचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करा; अन्यथा भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्याविरोधात जलसंपदा विभागातील अभियंत्यांनी ह्यएल्गारह्ण पुकारला असून, कारवाई टाळण्यासाठी १0 फेब्रुवारीपासून ३१ फेब्रुवारीपर्यंंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम लघूपाटबंधारे विभागांतर्गत येणार्या वाशिम, मालेगाव आणि रिसोडमध्ये एकंदरित ३४0 विहिरींची कामे करावयाची होती. त्यातून २३८ कामे पूर्ण झाली असून, २५ विहिरींची कामे रद्द झाली आहेत. धडक सिंचन योजनेत १६, तर ह्यनरेगाह्णमध्ये ६१, अशा ७७ विहिरी वर्ग करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९ फेब्रुवारीअखेर ७ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, १५ कामे प्रगतीपथावर आहेत. २५ विहिरींची कामे सुरू झाली नसून, ३0 विहिरी रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. तद्वतच पाटबंधारे उपविभाग, कारंजा अंतर्गत येणार्या कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा या तीन तालुक्यांमध्ये ५६२ विहिरींची कामे करावयाची होती. त्यातून ३५0 कामे पूर्ण झाली. ५0 विहिरी रद्द करण्यात आल्या, तसेच २0 विहिरी धडक सिंचन योजनेत; तर १४२ विहिरी ह्यनरेगाह्णमध्ये अशा एकूण १६२ विहिरी वर्ग करण्यात आल्या. त्यापैकी ९ फेब्रुवारीअखेर ३७ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. २८ कामे प्रगतीपथावर आहेत, ८७ कामे अद्याप सुरु झाली नाहीत, तर १0 विहिरी रद्द करण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, लघुपाटबंधारे विभाग क्रमांक १, २ आणि ३ कडे शासनाने सोपविलेल्या सुमारे ४ हजार विहिरींपैकी आतापर्यंंंत या विभागाने सुमारे ३८00 विहिरींची कामे यशस्विरीत्या पूर्ण केली असताना केवळ २00 च्या आसपास अपूर्ण असलेल्या कामांबाबत दोषी ठरवून फौजदारी दाखल करण्याचा इशारा देणे कितपत योग्य आहे, असा सवाल संबंधित अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.