शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

वाशिम जिल्ह्यात रखरखत्या उन्हामुळे डाळिंब बागा सुकल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:29 PM

वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत.

ठळक मुद्देकेळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे.त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत.

वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीपोटी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. वाशिम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र लक्षणीय आहे. केळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. आर्थिक उन्नतीसाठी फळबाग लागवडीचा आधार घेणाऱ्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मात्र उन्हाचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस खालावत आहे, तर पाण्याचा उपसा वारेमाप सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत. याचा सर्वाधिक फटका केळी आणि डाळिंबांच्या बागांना बसत असल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील २० टक्के डाळिंबाच्या बागा उन्हामुळे सुकल्या आहेत. पुरेशा पाण्याचा अभाव आणि कडक उन्ह डाळिंबांसाठी घातक ठरते. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली असल्याने जमिनीत ओलावा उरला नाहीच शिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांना डाळिंबांच्या बागा जगविणे कठीण झाले. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने डाळिंबांच्या बागाच वाळून जात आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील डिगांबर गिरी या शेतकºयाची पाच एकरातील डाळिंबाची बाग महिनाभरापूर्वीच सुकली, तर महेंद्र इंगोले या शेतकऱ्याची डाळिंबाची बागही उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहे. अशा अनेक शेतकºयांच्या डाळिंबांना यंदा उन्हाचा फटका बसल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती