शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

दुष्काळसदृष स्थितीचा महसूल वसूलीवर परिणाम; प्रशासकीय यंत्रणा हतबल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:34 PM

वाशिम : यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळसदृष स्थितीमुळे वसुलीवर परिणाम झाला असून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची उपजिविका शेती आणि तत्सम व्यवसायांवरच विसंबून आहे.महावितरणची विद्यूत देयके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकीत पाणीपट्टी, नगर परिषद, नगर पंचायतींकडून आकारला जाणारा मालमत्ता कर अदा करणे अनेकांना अशक्य झाले आहे. ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतीम पैसेवारी ४७ पैसे आहे.

वाशिम : दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत किती महसूल वसूल व्हायला हवा, याचे उद्दीष्ट प्रशासकीय यंत्रणांमधील प्रमुख विभागांना ठरवून दिले जाते. त्यानुसार, यंदाही नगर परिषदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, खनिकर्म विभाग, महावितरण, तहसील कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यासह इतरही यंत्रणांनी मिळालेल्या उद्दीष्टाच्या पुर्ततेसाठी जीवाचा आटापिटा करणे सुरू केले आहे. मात्र, यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळसदृष स्थितीमुळे वसुलीवर परिणाम झाला असून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांची उपजिविका शेती आणि तत्सम व्यवसायांवरच विसंबून आहे. असे असताना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तथा विविध स्वरूपातील संकटांमुळे अपेक्षित उत्पादन न झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. परिणामी, महावितरणची विद्यूत देयके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची थकीत पाणीपट्टी, नगर परिषद, नगर पंचायतींकडून आकारला जाणारा मालमत्ता कर अदा करणे अनेकांना अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम प्रशासनाकडून अवलंबिण्यात आलेल्या करवसुली, महसूल वसुलीवर झाला असून १४ मार्चपर्यंत सर्वच यंत्रणांकडून वसुलीचे ५० टक्के उद्दीष्टही साध्य झालेले नाही, अशी माहिती त्या-त्या विभागाकडून प्राप्त झाली.७७४ गावांची अंतीम पैसेवारी ४७ पैसे!जिल्हा प्रशासनाकडून जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतीम पैसेवारी ४७ पैसे आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूरांसह इतर घटक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्याने मार्चअखेरपर्यंत अपेक्षित महसूल वसुलीचे प्रमाण घटणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :washimवाशिम