शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जिल्हा पात्र असूनही ‘अग्रीम’मधून डावलला; शेतकऱ्यांवर अन्याय

By सुनील काकडे | Updated: November 4, 2023 19:16 IST

विमा कंपनीकडून सावत्रपणाची वागणूक

वाशिम : पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णयानुसार, यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकरी २५ टक्के आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळण्यासाठी पात्र ठरले होते. तसा सर्वंकष आणि प्रभावी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी तयार करून मंजूरीसाठी पाठविला होता; मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांना झुकते माप देवून पीक विमा कंपनीने वाशिमला त्यातून सपशेल डावलल्याची माहिती ४ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली.

जिल्ह्यात खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यात पावसातील खंडामुळे पिकांच्या अपेक्षित उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व ४६ महसूल मंडळांमध्ये पीक नुकसानीची अधिसूचना निर्गमित केली. तथापि, पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे अपेक्षित उत्पादनात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार असेल तर विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे पीक विमा योजनेसंदर्भातील शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असताना आणि कृषी विभागाने तसा सविस्तर अहवाल सादर करूनही विमा कंपनीने मात्र जिल्ह्याला २५ टक्के ‘अग्रीम’मधून डावलले आहे. हा शेतकऱ्यांवर एकप्रकारे मोठा अन्याय असल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून उमटत आहे.चालूवर्षीच्या खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर पोहोचली होती. त्यानुसार, कृषी विभागाने जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळांमध्ये सर्वेक्षण करून सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार असल्याचा अहवाल सादर केला. नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळणे अपेक्षित होते; मात्र विमा कंपनीने त्यातून एकमेव वाशिम जिल्ह्यालाच का डावलले, हे कळू शकले नाही.- आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम