शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 14:43 IST

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सर्वदूर यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३१ लघू आणि ३ मध्यम अशा एकूण १३४ प्रकल्पांमध्ये सद्या केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यासोबतच कुपनलिका, हातपंप, विहिरी आदी जलस्त्रोतही आटले आहेत. जमिनीखालची पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.जिल्ह्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात सातत्य नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: ‘दख्खन बस्तर लाव्हा’ या प्रकारच्या खडकाचे आहे. पूर्णपणे ‘बेसॉल्ट’ने आच्छादित या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी ‘व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तर’ची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा वाढण्यास मदत मिळते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या काही वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीखालच्या पाणीपातळीवर प्रचंड परिणाम झाला असून उन्हाळ्यात त्याची गंभीरता दिसून येत आहे.सद्य:स्थितीत जमिनीखालची पाणीपातळी दीड मीटरपेक्षाही अधिक खोलवर गेल्याने मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कुपनलिका खोदूनही पाणी लागणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पैसे व्यर्थ खर्च होण्यासोबतच कुपनलिका खोदताना भूजल अधिनियमाची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.वाशिम जिल्ह्यात सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून याकामी प्रशासनाला सहकार्य करण्यासोबतच नियमबाह्य पद्धतीने कुपनलिकांचे खोदकाम करू नये.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

नियमबाह्य पद्धतीने अधिक खोलवर कुपनलिका घेणे, ठराविक अंतराची मर्यादा न पाळता मन मानेल त्या अंतरावर कुपनलिकांसाठी खोदकाम करण्याच्या प्रकारामुळे जमिनीखालची पाणीपातळी दिवसागणिक खोलवर चालली आहे. मात्र, या गंभीर प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी सद्यातरी प्रशासकीय पातळीवर पुरेशा मनुष्यबळासह अन्य ठोस व्यवस्था नाही.- एस.एस. कडू, वरिष्ठ भुजल वैज्ञानिक

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ