शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 14:43 IST

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सर्वदूर यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३१ लघू आणि ३ मध्यम अशा एकूण १३४ प्रकल्पांमध्ये सद्या केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यासोबतच कुपनलिका, हातपंप, विहिरी आदी जलस्त्रोतही आटले आहेत. जमिनीखालची पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.जिल्ह्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात सातत्य नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: ‘दख्खन बस्तर लाव्हा’ या प्रकारच्या खडकाचे आहे. पूर्णपणे ‘बेसॉल्ट’ने आच्छादित या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी ‘व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तर’ची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा वाढण्यास मदत मिळते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या काही वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीखालच्या पाणीपातळीवर प्रचंड परिणाम झाला असून उन्हाळ्यात त्याची गंभीरता दिसून येत आहे.सद्य:स्थितीत जमिनीखालची पाणीपातळी दीड मीटरपेक्षाही अधिक खोलवर गेल्याने मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कुपनलिका खोदूनही पाणी लागणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पैसे व्यर्थ खर्च होण्यासोबतच कुपनलिका खोदताना भूजल अधिनियमाची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.वाशिम जिल्ह्यात सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून याकामी प्रशासनाला सहकार्य करण्यासोबतच नियमबाह्य पद्धतीने कुपनलिकांचे खोदकाम करू नये.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

नियमबाह्य पद्धतीने अधिक खोलवर कुपनलिका घेणे, ठराविक अंतराची मर्यादा न पाळता मन मानेल त्या अंतरावर कुपनलिकांसाठी खोदकाम करण्याच्या प्रकारामुळे जमिनीखालची पाणीपातळी दिवसागणिक खोलवर चालली आहे. मात्र, या गंभीर प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी सद्यातरी प्रशासकीय पातळीवर पुरेशा मनुष्यबळासह अन्य ठोस व्यवस्था नाही.- एस.एस. कडू, वरिष्ठ भुजल वैज्ञानिक

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ