शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी दोन हजार जलपात्र वितरणाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:58 IST

वाशिम:पाण्याअभावी जीव गमावण्याची वेळ पक्ष्यांवर येऊ नये म्हणून मंगरुळपीरच्या वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीमने एक उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्यावतीने वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी सतत विविध उपक्रम राबविण्यात येतात.त्यांच्यावतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मातीपासून तयार केलेले २००० हजार जलपात्र वितरित करण्यात येत आहेत. जलपात्रांची संख्या आणखी वाढविण्याचा त्यांचा मानस असून, यासाठी त्यांनी जनतेला तुटपूंजी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

वाशिम: रखरखत्या उन्हात थेंबभर पाण्यासाठी सैरभैर फिरल्याने दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू होतो. पाण्याअभावी जीव गमावण्याची वेळ पक्ष्यांवर येऊ नये म्हणून मंगरुळपीरच्या वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीमने एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यावतीने दोन हजार मातीच्या जलपात्रांचे वितरण इच्छुकांना करण्यात येत असून, यासाठी जनतेनेही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विषेश म्हणजे हे वन्यजीवरक्षक स्वत:ही जंगलातील झांडावर शेकडो जलपात्र बांधत आहेत. 

मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्यावतीने वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी सतत विविध उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, सामाजिक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसाधारण जनतेचे सहकार्यही त्यांच्याकडून घेण्यात येते. यंदाच्या उन्हाळ्यातही त्यांनी पक्षी रक्षणासाठी असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याअभावी दरवर्षी हजारो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागते. ही बाब पर्यावरण आणि सृष्टीसाठी निश्चितच दु:खदायक आहे. त्यामुळे पाण्यावाचून पक्ष्यांचा जीव जाऊ नये म्हणूून, त्यांच्यावतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मातीपासून तयार केलेले २००० हजार जलपात्र वितरित करण्यात येत आहेत. हे जलपात्र इच्छुक लोकांना मोफत वितरित करण्यात येणार आहेत. जलपात्रांची संख्या आणखी वाढविण्याचा त्यांचा मानस असून, यासाठी त्यांनी जनतेला तुटपूंजी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही केले आहे. मंगरुळपीर वाईल्डलाइफ कन्झर्वेशन टीमचे प्रमुख तथा मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यासह सुबोध साठे, गणेश गोरले, सागर गुल्हाने, वेदांत नावंधर, अतुल कथले, शुभम ठाकूर, गणेशकुमार राऊत, आकाश खडसे आणि शरद दंडे हे सदस्य या उपक्रमासाठी सतत झटत आहेत. नागरिकांनी मदत करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले आहे. पक्षी नावाचा ठेवा जपण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव