शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

विकासकामे उठलीत शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

अकोला-आर्णी या राज्यमार्गाच्या दर्जा वाढ करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए मागील दोन वर्षापासून सर्जन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरएनएस, इन्फ्रा ...

अकोला-आर्णी या राज्यमार्गाच्या दर्जा वाढ करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए मागील दोन वर्षापासून सर्जन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरएनएस, इन्फ्रा कंपनीकडून निर्माण करण्यात येत आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या महामार्गाच्या बांधकामापूर्वी नाहरकत देताना जनतेचे आरोग्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक अटी घातल्या आहेत. तथापि, पर्यावरण मंत्रालयाच्या अटींचे सर्रास उल्लंघन सर्जन आणि आरएनएस इन्फ्रा. कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती, उपविभागीय अभियंता, यवतमाळ यांच्याकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या उपद्रवामुळे नागरिकांचे आणि विशेषतः मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आरोग्य व शेती धोक्यात आल्याने या बेकायदेशीर कामास तात्काळ पायबंद घालण्यासाठी गैरअर्जदार कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याविरोधात तातडीने आदेश पारित होणे अगत्याचे आहे.

मानोरा तालुक्यातील या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सिंगडोह, साखरडोह, हळदा, कोलार, आमगव्हाण, मानोरा, विठोली, बेलोरा, चाकूर, माहुली, हातना, पंचाळा, वाईगौळ, सावळी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक धुळीच्या प्रचंड लोटाने पूर्णपणे काळवंडत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले आहे.

----------

कोट: निर्माणाधीन महामार्गावरील मातीचे लोट उभ्या पिकांवर साचत असल्याने पांढरे शुभ्र कपाशीचे पीक मातीमोल झालेले आहे. पाच हजाराच्या वर क्विंटलला दर मिळणाऱ्या कपाशीला कंपनीच्या हलगर्जीपणामुळे धुळीने माखल्याने या शेतकऱ्यांचे कापूस कोणी दोन हजार रुपये क्विंटल दराने घ्यायलाही तयार नाही.

रोहिदास नागोराव पवार,

शेतकरी, मानोरा