गारपिटीचा निधी त्वरित देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:13+5:302021-09-12T04:47:13+5:30
मोतसावंगा शेत शिवारात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा या पिकाची पेरणी केली होती, परंतु पीक काढणीला आले असताना गारपीट ...

गारपिटीचा निधी त्वरित देण्याची मागणी
मोतसावंगा शेत शिवारात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा या पिकाची पेरणी केली होती, परंतु पीक काढणीला आले असताना गारपीट झाली. त्यामध्ये १०० टक्के सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तहसीलदार यांनी स्वत: पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार, शेतात जाऊन संबंधितांनी पाहणी करून पंचनामा व पाहणी अहवाल तयार केला, परंतु मोतसावंगा हे गाव शासनाच्या मदत निधीमधून वगळण्यात आले. याबाबत आपणास २० मार्च, २०२० रोजी विनंती अर्ज सादर केलेला आहे . त्या अर्जानुसार आजपावेतो कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
७ दिवसांच्या आत मदत निधी देण्यात यावा, अन्यथा सर्व शेतकरी बांधव सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार आहे. निवेदनावर माजी जि.प. सदस्य विश्वास गोदमले, मोहन गहुले, गोपाल निचळ, नाना निचळ, ज्ञानदेव इढोळे, गजानन गिऱ्हे, शरद निचळ, महादेव वाघमारे, ओंकार निचळ, विजय भोंडणे, अशोक वाघमारे, नंदू लोखंडे, उमेश गिऱ्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.