शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

सदोष बियाणे; ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:24 AM

याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातीला कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकांनी तपासणीसाठी संकलित केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या नमुन्यातील अनेक नमुने सदोष आढळले आहेत. याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने संकलित केले आहेत. या नमुन्यांची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासली जात आहे. त्यात जिल्हाभरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातील पथकासह जिल्हा परिषदेच्या पथकाने ९६ पेक्षा अधिक बियाण्यांचे नमुने संकलित केले. त्यापैकी ८५ नमुन्यांचे अहवाल कृषी विभागास प्राप्त झाले असून, त्यातील ३८ नमुने सदोष असल्याने संबंधित कंपन्या कोर्ट खटल्याच्या कक्षेत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. त्यात जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाºयाच्या मागदर्शनातील पथकाने संकलित केलेले ३४, तर अधीक्षक कृषी अधिकाºयाच्या मार्गदर्शनातील पथकाने संकलित केलेल्या ४ नमुन्यांचा समावेश आहे. शिवाय २० नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीस ताकिद दिली असून, त्यात अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या पथकाचे १२ आणि जि.प.च्या पथकाने संकलित केलेल्या १२ नमुन्यांचा समावेश आहे. सदोष आढलेल्या नमुन्यांत सर्टिफाईड बियाण्यांचे १२, तसेच ट्रुथफुल बियाण्यांच्या ६ नमुन्यांचा समावेश आहे. दरम्यान, अद्यापही ११ नमुन्यांच अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालामुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सदोष बियाण्यांचीही विक्री झाल्याचे निष्पन्न होत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे नमुने सदोष आढळून आल्याने हजारो शेतकºयांनी बियाणे न उगवल्याबाबत केलेल्या तक्रारीत बव्हंशी सत्यता असल्याचे निष्पन्न होत आहे. दरम्यान, सदोष गुणनियंत्रण निरीक्षकांनी संकलित केलेल्या इतरही एका लॉटमधील नमुने सदोष आढळले आहेत; परंतु त्याची विक्री झाली नाही.गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात संकलित केलेल्या आणि सदोष आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीला कायद्यानुसार कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसच्या खुलाशाची प्रतिक्षा आहे. कंपन्यांच्या खुलाशाची पडताळणी करण्यात येणार आहे. ज्या कंपनीचा खुलासा समाधानकारक नसेल, त्या कंपनीवर सदोष बियाणे विक्री प्रकरणी नियमानुसार कोर्ट खटला दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे खुलाशांची प्रतिक्षा आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र