शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मंगरुळपीर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई; पाण्यासाठी रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 14:07 IST

मंगरुळपीर तालुकयात असे काही चित्र असून तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांच्या पाण्यासाठी रांगा लागताना दिसून येत आहेत.

- नाना देवळे मंगरुळपीर  : गेली अनेक वर्षांपासून निसर्गाच्या समतोल बिघडल्याने पर्जन्यमानात मोठी घट होत आहे. त्यामुळे दरवर्षी अनेकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन शासनाने वेळीच उपाययोजना करने गरजेचे आहे, मात्र शासन ऐनवेळी व संथगतीने उपाययोजना करीत असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे, मंगरुळपीर तालुकयात असे काही चित्र असून तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांच्या पाण्यासाठी रांगा लागताना दिसून येत आहेत.  ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला, तरी गेली अनेक वर्षांपासून विनापरवाना पाण्याचा वारेमाप उपसा होत असल्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे , त्यामुळे उन्हाळ्यापुर्वीच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणाºया योजनावरील कूपनलिका पुर्णत: तळाला गेल्या आहेत,. याशिवाय परिसरातील नदी, नाले , विहिरी कोरडया पडल्या आहेत, . त्यामुळे अनेक गावाचा पाणीपुरवठा प्रभावीत होऊन ग्रामस्थांला  मजुरीचे कामे बाजूला सारुन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . परिणामी पाणी दूरवरून आणावे लागत असल्याने पूर्ण दिवस पाणी आणण्यासाठी जातो. त्यामुळे अनेक समस्याला सामोर जावे लागते. पाणीटंचाई तीव्रता  ही बाब लक्षात घेऊन शासनाने यावर तात्काळ उपाय योजना करणे आवश्यक असताना पाणीटंचाई उपाययोजना काम संथगतीने होत असल्याचे दिसून येत आहे . जनतेची गरज लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमध्ये केली जात आहे.मंगरुळपीर तालुक्यातील ११६ गावापैकी २९ गावाने जलस्तोस्त्र अधिग्रहण साठी पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहे. यामध्ये शेंदुरजना मोरे,लाठी झाडगाव, जांब प्लॉट, पिंप्री अवगण, आजगाव, माळशेलु,शेगी, मजलापूर, खापरी, पोटी, चीचखेडा, चेहेल, स्वासीन, रहित, धानोरा बु,सालंबी, वसंतवाडी, मोझरी, चांभई, जोगलदरी, पारवा, अरक, चिंचाळा, बोरवा, शिवनी रोड, धोत्रा, जांब, मसोला, पिपळखुटा, गोलवाडी, ईचा, पिप्री अवगण, जनूना, बालदेव, कोठारी तर टँकरकरीता प्रस्ताव करिता बिटोडा भोयर, कळंबा बोडखे, धानोरा खु, सनगाव, सोनखास, शहापूर, या गावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे पाठविला आहे. यापैकी २९ विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव तहसील विभागाने मंजूर केला आहे, परंतु अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे ग्रामास्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तलावाची घटलेली पाणीपातळी मोतसावंगा २२.३५, सिंगडोह मृतसाठा, सावरगाव एलएएल खाली,  कोलंबी एल.एस.एल. खाली, जोगलदरी १४.८५, कासोळा १२.३, चांदई कोरडा, दस्तापुर ११,५० पाणी पातळी असून  नादखेडा, चोरद , मोहरी, पिप्री , स्वासीन, साशीर्, कवठळ , पिप्री बु, , सार्शी १ हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. येत्या काही दिवसांनी ज्यामध्ये जलसाठा आहे तेही कोरडे पडणार असल्याचे चिन्ह आहे.  मागणी केलेल्या गावाचा प्रस्ताव वरिष्टकडे पाठवला आहे मंजूर होताच पाणी पुरवठा करण्यात येईल.तशा उपाय योजना करण्यात येत आहेत.- ज्ञानेश्वर टाकरस, गटविकास अधिकारी, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwater scarcityपाणी टंचाई