बाजार समितीमधील गाळे प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:48+5:302021-09-12T04:47:48+5:30
रिसोड: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळे संदर्भातील प्रकरणात माजी सभापती व इतरांवर जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये गुन्हे ...

बाजार समितीमधील गाळे प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण
रिसोड: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळे संदर्भातील प्रकरणात माजी सभापती व इतरांवर जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा पोलीस निरीक्षक यांना निवेदनातून भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष खुशालराव पाटील ढोणे यांनी ११ सप्टेंबर रोजी दिला आहे
निवेदनात नमूद केले की जिल्हा उपनिबंधक वाशिम यांनी आदेश क्रमांक कलम ४० ई निर्देश ४१, ४८/ २०२१ ३० ऑगस्ट २०२१ नुसार रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने चुकीच्या पद्धतीने सहायक निबंधक सहकारी संस्था रिसोड यांचे शासकीय कार्यालय भाडेपत्र करून दिले. यासंदर्भात रवी गडेकर मुख्य प्रशासक यांनी गजानन घोंगडे व इतर संबंधित दोषी व्यक्तीवर भारतीय दंड विधान अठराशे साठ मधील कलम ४६०, ४०८, ४०९, ४२०, ४२३, ४६३, ४७७ अ, ४६४ नुसार गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले आहे, असा आदेश सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड यांना देऊन गजानन घोंगडे व माजी सभापती यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सांगितल्यावरून सचिव यांनी दिनांक २६ ऑगस्ट रोजी रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टवर वरील क्रमानुसार गुन्हे दाखल केले किंवा नाही, याबाबत आपणास लेखी कळविण्यात यावे किंवा गुन्हे दाखल का झाले नाहीत, याबाबत माहिती तत्काळ देण्यात यावी तसेच गुन्हे दाखल न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
110921\img_20210911_162046.jpg
?????? ???? ? ??????? ???? ????? ????? ????? ????