शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 11:54 AM

Damage to crops on 3200 hectares due to heavy rains : नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्ह्यात २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२०० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, २८८८ हेक्टरवरील नुकसानाचा सर्वे पूर्ण झाला. दुसरीकडे ४३३ हेक्टर जमीन खरडून गेली असून मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.जिल्ह्यात मृग नक्षत्रात यापैकी बरसलेल्या पावसाने जूनच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला दडी मारली होती. त्यामुळे पिके संकटात सापडली होती. दरम्यान, ११ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पाऊस बरसला. २१ ते २३ जुलै दरम्यान अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठावरील शेतातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल व कृषी विभागातर्फे युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून, आतापर्यंत २८८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले तर ३८८ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे सोमवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे १० लहान व १० मोठी अशी एकूण २० जनावरे दगावली तर एका घराची पूर्णत: तर ४१ घरांची अंशत: पडझड झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी याकरिता मंगळवारपर्यंत शासनाकडे अहवाल पाठविला जाण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात २१ ते २३ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागात पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात पंचनामे केले जात आहेत. सोमवारपर्यंत पंचनामे पुर्ण होण्याची शक्यता असून, मंगळवारपर्यंत नुकसानभरपाई संदर्भातील अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. - शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती