शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

पिकविमा कंपनीही करणार नुकसानाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 5:58 PM

नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी, पीकविमा उतरविणाºया शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे पिकविमा कंपनीकडूनही करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशुक्रवार १८ आॅगस्टपर्यंत पावसाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके नेस्तनाबुद झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी या कंपनीने प्रतिनिधींची निवड केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात बुधवार १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर पावसाने थैमान घालत शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून करण्यात येत असली तरी, पीकविमा उतरविणाºया शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे पिकविमा कंपनीकडूनही करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकºयांना ४८ तासांत कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी लागणार आहे. जिल्ह्यात  पावसाने बुधवार १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवार १८ आॅगस्टपर्यंत पावसाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके नेस्तनाबुद झाली. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. या नुकसानाची पाहणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी करून शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली आणि प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामेही करण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा उतरविला आहे. त्या शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे पीकविम्याची जबाबदारी असून, पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी या कंपनीने प्रतिनिधींची निवड केली आहे. ज्या शेतकºयांनी पीकविमा उतरविला आहे. त्या शेतकºयांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पुरावा म्हणून शेतकºयांना एक आयडी क्रमांकही प्राप्त होणार आहे. त्या आयडी क्रमांकाच्या आधारे शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी विमा कंपनीचे प्रतिनिधी करणार आहेत. या पाहणीनंतर नुकसानाची प्रत्यक्ष अहवाल तयार करून तो पिकविमा कंपनीकडे सादर करण्यात येणार आहे. यामुळे शेतकºयांना पिकविम्याचा तातडीने लाभ मिळणे शक्य होणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांनी ही माहिती दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा