शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

खरिपातील पिके अंकुरली; पाणीटंचाई कायमच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:12 IST

वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे बहुतांश गावांमधील खरिपातील पिके अंकुरली आहेत;

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात गत काही दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे बहुतांश गावांमधील खरिपातील पिके अंकुरली आहेत; मात्र पर्जन्यमान अगदीच अल्प प्रमाणात तद्वतच सार्वत्रिक स्वरूपात नसल्याने जिल्ह्यातील धरणांसह अन्य जलस्त्रोतांची पातळी न वाढल्याने उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची स्थिती अद्याप कायमच आहे. पर्यायाने पाणीटंचाई निवारण उपाययोजनांवरील खर्चात देखील यंदा वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: जून महिण्याच्या पंधरवड्यात दमदार स्वरूपात पाऊस होतो. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची कामे देखील वेळेत आटोपली जातात. यंदा मात्र पावसाला विलंबाने सुरूवात होण्यासोबतच जिल्ह्यातील काहीच गावांमध्ये तोही तुरळक स्वरूपात पाऊस झाला. त्याआधारे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली असून पिके देखील अंकुरली आहेत. असे असले तरी पिकांची वाढ होण्यासाठी पावसात सातत्य असणे आवश्यक असून त्याचा प्रामुख्याने अभाव आहे. दुसरीकडे पावसाळ्याचे दिवस असूनही अद्यापपर्यंत संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघूप्रकल्पांसह विहिरी, हातपंप आणि कुपनलिकांच्या पाणीपातळीतही विशेष वाढ झाली नसल्याने उद्भवलेली भीषण पाणीटंचाईची स्थिती अद्याप कायम आहे. सद्य:स्थितीत ६४ गावांमध्ये ६४ टँकरने पाणीपुरवठा, ३०० पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण यासह अन्य स्वरूपातील टंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत असून एरव्ही ३० जूननंतर बंद केल्या जाणाºया या उपाययोजनांना शासनस्तरावरून मुदतवाढ दर्शविण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाई निवारण उपाययोजनांवर प्रत्यक्ष तरतूदीपेक्षा अधिक खर्च होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती