शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus in Washim : ५०५ रुग्णांची गृह विलगीकरणाला पसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 6:18 PM

यंत्रणेवरील ताण काही अंशी कमी होऊन जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांना वेळेत उपचार करणे अधिक सुलभ झाले.

वाशिम : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या; परंतू, सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास नसलेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यात गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर ५०५ रुग्णांनी गृह विलगीकरणाला पसंती दिली. गत १५ दिवसात २२८ जणांना डिस्चार्ज मिळाला असून, सध्या २७७ जण गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण हा मेडशी (ता.मालेगाव) येथे आढळला होता. परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात परतल्याने जुलै महिन्यापासून जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात तर यामध्ये अधिकच वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. या पृष्ठभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह; परंतू सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाºया तसेच घरातच स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था असलेल्या आणि स्वत:साठी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करणाºया रुग्णांना ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत ५०५ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्विकारला असून, यापैकी २२८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या २७७ जण गृह विलगीकरणात आहेत. गृह विलगीकरणामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही अंशी कमी होऊन जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांना वेळेत उपचार करणे अधिक सुलभ झाले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या