शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : ‘होम क्वारेंटीन’ कुटूंब गेले गाव सोडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:07 IST

जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत १४ दिवस थांबण्याचा सल्ला दिला; परंतु सदर कुटूंबाने त्यास नकार देत गावच सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी: मानोरा तालुक्यातील इंझोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उंबर्डा लहान येथील एका कुटूंबातील तिघे हैदराबाद येथून रविवारी रात्री गावी परतले. ग्रामपंचायतने त्यांची चौकशी व तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटिनचे शिक्के मारत गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत १४ दिवस थांबण्याचा सल्ला दिला; परंतु सदर कुटूंबाने त्यास नकार देत गावच सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.इंझोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया उंबर्डा लहान येथील पती, पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा असे तिघे जण हैदराबाद येथे गेले होते. दरम्यान, कोरोना विषाणू ससंर्गावर नियंत्रणासाठी शासनाने देशभरात लॉकडाऊन जारी करीत जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे हे कुटुंब हैदराबाद येथेच अडकून पडले होते. अखेर काही दिवसांपूर्वी या कुटुंबाने हैदराबाद सोडून गावाकडे पायी मार्गक्रमण सुरु केले. १०, १५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर हे कुटुंब रविवारी उंबर्डा येथे पोहोचले. वाशिम जिल्ह्यातही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सीमाबंदी, लॉकडाऊन, संचारबंदी असतानाच परजिल्ह्यातून पतरणाºया नागरिकांची तपासणी करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटिनमध्ये ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार इंझोरीच्या सरपंच तथा ग्रामस्तरीय समिती अध्यक्ष कांताबाई हळदे यांच्या सुचनेनुसार हैदराबाद येथून परतलेल्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटिनचे शिक्के मारून त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत १४ दिवस थांबण्याची सुचना केली, तशी नोटीसही ग्रामपंचायतने त्यांना दिली; परंतु सदर कुटुंबाने तेथे थांबण्यास नकार देत गाव सोडल्याचा प्रकार घडला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून, हे कुटुंब आता नेमके कुठे गेले, ते माहिती नसल्याने कोरोना प्रतिंबधासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने या प्रकाराची माहिती पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयासह आरोग्य विभागाला दिली आहे. त्यावरून शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या