शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

कोरोना लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:17 IST

Corona Vaccine News अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट असल्याने गेल्या ७ दिवसांत केवळ ९०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी शनिवार, १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत ५ हजार ५५० ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना लस दिली जात आहे; मात्र लस घेण्याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट असल्याने गेल्या ७ दिवसांत केवळ ९०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे; तर ४ हजार ६५० कर्मचारी अद्याप बाकी आहेत. दरम्यान, लस सुरक्षित असल्याबाबत आरोग्य विभागाकडून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत असून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोणताही सक्षम पर्याय नसल्याने देशात जवळपास दीड कोटी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही सुमारे ७ हजार नागरिक या विषाणूने बाधित झाले असून १५२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विषाणूच्या संसर्गाचा वेग काहीसा मंदावला असला तरी धोका पूर्णत: टळलेला नाही. त्यामुळे संसर्गापासून बचाव करणारी लस देण्याची मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना बाधितांवर उपचार करताना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा येथील केंद्रांवर ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना ही लस दिली जात आहे. याअंतर्गत शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील एकूण ५ हजार ५५० कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य विभागाने नोंद केली होती. त्यातील केवळ ९०० जणांनीच आतापर्यंत ही लस घेतली असून तब्बल ४ हजार ६५० कर्मचाऱ्यांनी लस घेण्याबाबत तयारी दर्शविलेली नाही. दरम्यान, लस सुरक्षित असून घाबरण्याचे कुठलेच कारण नसल्याचे सांगत जिल्हा आरोग्य विभागाकडून यासंबंधील युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी न भिता लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रिॲक्शन काय?कोरोनाची लस घेतल्याच्या काही तासानंतर अंगाला ताप येऊन अंगदुखी जाणवते. यामुळे थकवा येतो. असे असले तरी ही रिॲक्शन फार काळ राहत नाही. काही वेळेनंतर व्यक्ती पुर्वीप्रमाणेच वावरायला लागतो, असे अनुभव अनेक कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.

 

कोरोना लसीविषयी सध्या सोशल मीडियातून काही नकारात्मक संदेश प्रसारित केले जात आहेत. असे संदेश अर्धवट माहितीच्या आधारे पाठवले जातात. कोरोनाची लस पूर्णत: सुरक्षित आहे, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट जाणवला नाही. - डॉ. अविश दरेकार आयुष अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

लसीकरणानंतर १५ ते १६ तासांनंतर अंगात काहीसा ताप जाणवला. लस टोचून घेतल्यानंतर अशी काही सौम्य लक्षणे दिसू शकतील, याची मला जाणीव होती. काही तासांनंतर ताप कमी झाला. त्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही.  - विद्या किसनराव भुसारे परिचारिका, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

कोरोनाची लस सर्वच बाबतीत सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर तत्काळ काहीच त्रास जाणवला नाही. १२ तासानंतर मात्र थोडासा ताप, अंगदुखी जाणवली. मात्र, ही काही गंभीर बाब नाही. लस शरीरात गेल्यानंतर तिचे ‘इम्यूनाइजेशन’ होताना अशी लक्षणे दिसणे साहजिक आहे. आता ताप, अंगदुखी कमी झाली असून इतर कोणताही गंभीर त्रास जाणवला नाही. - आरती अतुल ताठेआैषध निर्माण अधिकारी, पोहा

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर स्टाफने सोशल मीडियातून पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. त्यापेक्षा प्रत्यक्ष लस घेतलेले वरिष्ठ डॉक्टर, सहकाऱ्यांशी चर्चा करून संभ्रम दूर करावा. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लस टोचून घेणे आवश्यक आहे. मीसुद्धा लस घेतली असून कुठलाही त्रास जाणवलेला नाही. - डॉ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम