शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 3:29 PM

ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या या संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीचीच पाळी आली आहे.वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात २२ हजार संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल इंडियाचे कामकाज करीत आहेत. सन २०११ १२ मध्ये संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ही ‘संग्राम’ योजनेंतर्गत या २२ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये याच संगणक परिचालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अंतर्गत केंद्रचालकाचे पद देऊन पुन्हा नियुक्त करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्प सुरू केला आहे. या संदर्भातील शासन निर्णयानुसार एका केंद्रचालकाना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापक ४५० रु., स्टेशनरीसाठी २७०० रुपये प्रति महिना आणि प्रशिक्षणसाठी १३०० रुपये व इतर मिळून एकुण १२,५०० रुपये कंपनी आकारते, तरे ग्रामपंचायत एका वर्षासाठी १ लाख ४७ हजार रुपये या कंपनीला देते.यामधूनच नियमित केंद्रचालकांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मिळते. त्यात टीडीएसच्या काही रक्कम कंपनी आपल्या खात्यात ठेवते. हे टीडीएस केंद्रवालकांनाही मिळणे अपेक्षीत असताना अद्याप कोणत्याच संगणक परिचालकाला हे टीडीएस मिळाले नाही.त्यातच या संगणक परिचालकांचे एप्रिल, मे, जुन आणि जुलै मिळून चार महिन्यांचे वेतन संबंधित कंपनीकडे थकले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह शासनाने या संगणक परिचालकांच्या समस्येची दखल घेऊन तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी संगणक परिचालक करीत आहेत. कामबंद आंदोलानाला प्रारंभ !गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांच्या समस्यांबाबत बोलताना १० दिवसांच्या आत सर्व समस्यांचा निपटारा करण्यासह संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आता ८ महिने उलटले तरी, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. तसेच इतरही विविध मागण्या प्रलंबित असल्याने मंगरुळपीर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्तीचे आश्वासन दिले होते. आता ८ महिने झाले तरी, त्याची दखल घेण्यात आली नाहीच उलट चार महिन्यांपासून आमचे मानधनही झाले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.-ज्ञानेश्वर मुखमालेमंगरुळपीर तालुकाध्यक्षसंगणक परिचालक संघटना

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत