शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली - विजय वडेट्टीवार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 16:11 IST

मुख्यमंत्र्यांनी जिल्हयातील मोजक्याच सरपंचाशी चर्चा करुन दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने  पुसले असल्याचा आरोप विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वाशिम येथे १५ मे रोजी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम जिल्हयामध्ये अतिशय तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या दुष्काळाच्या दहाकतेमुळे मानव व प्राण्याबरोबरच इतर सजीवांना देखील जगणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री महोदय ठोस उपाययोजना करण्याऐवजी आचारसंहितेचे कारण दाखवित नागरिकांच्या दुष्काळी समस्याकडे दुर्लक्ष केले आहे.  केवळ कॉम्फरंसव्दारे जिल्हयातील मोजक्याच सरपंचाशी चर्चा करुन जिल्हयातील दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने  पुसले असल्याचा आरोप विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वाशिम येथे १५ मे रोजी पत्रकार परिषदेत केला.तसेच शासनाने जलयुक्त शिवाराच्या नावावर मोठ्या प्रमाणात काम केल्याचा गाजावाजा करुन महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दुष्काळी मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. आपल्या विदर्भ विभागासाठी या समितीमध्ये माझ्यासह  माजी मंत्री वसंतराव पुरके , आम. रणजित कांबळे, आ. विरेंद्र जगताप, राजेंद्र मुळक, अमित झनक, प्रवक्ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे. ही समिती जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलिपराव सरनाईक व जिल्हयातील सर्व नेते सोबत घेवून वाशिम जिल्हयातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करुन दुष्काळाचा, दाहकता व दुष्काळाचे चटके सहन करणाºया नागरिकांच्या समस्या जाणून घेवून दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भात शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले. दुष्काळ उपाययोजना करण्यासाठी आमच्या मागण्यांची तत्काळ दखल घेवून तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही समिती मागणी  करणार असून आमच्या मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्त भागांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर व प्राण्यांसाठी हौदाचे बांधकाम करुन तातडीने पाणीसाठा उपलब्ध करुन द्यावा, पाण्यासाठी विहीर व टयूबवेल अधिग्रहण करुन त्या अधिग्रहीत केलेल्या विहीरींचा तात्काळ मोबदला मिळवून द्यावा, अद्यापपर्यंत न मिळालेली पीकविम्याची रक्कम तत्काळ द्यावी. रोजगार हमी योजने अंतर्गत धरणे, शेततळे, नदी खोलीकरण, सिमेंट बांध या माध्यमातून मजुरांना रोजगार मिळवून द्यावा,  जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरु कराव्या.. शासनाने जाहीर केलेली वार्षीक रुपये ६००० दुष्काळी मदत वंचीत शेतक-यांना मिळवून द्यावी. दुष्काळ भागात गहू, ज्वारी, तांदूळ यांचे उत्पादन कमी झाल्यामुळे गावातील नागरिकांना रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य मिळवून द्यावे.  दुष्काळग्रस्त विभागातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी., लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक यांची विशेष बैठक बोलावून दुष्काळ उपाययोजनेसाठी कृती आराखडा तयार करावा ,दुष्काळी भागातील शेतकºयांचे सरसकट पीककर्ज माफ करुन तात्काळ दि. ७ जून २०१९ पर्यंत पीककर्ज उपलब्ध करुन द्यावे., खत, बी-बियाणे यांच्या किमती कमी करुन शेतकºयांना मोफत मुबलक प्रमाणात खत बि-बियाणे उपलब्ध करुन द्यावे. तसेच शेतक-यांचे वीजबिल तात्काळ माफ करावे. शासनाने जाहीर केलेले तुरीचे रुपये १००० चे अनुदान तात्काळ देण्यात यावे.  दुष्काळी भागातील निराधार व वृध्दापकाळ योजनांची अंमलबजावणी करणेबाबत.. वाशिम शहरात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे १२ दिवसात १ वेळा नळ येतात ते दररोज यावे यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावे.या मागण्याचा समावेश आहे.सदर मागण्यांची तात्काळ दखल घेवून दुष्काळी भागामध्ये ताबडतोब उपाययोजना कराव्यात व दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समिती सदस्यांसह  ईश्वा राठोउ सरपंच, वाय.के.इंगोले,  अ‍ॅड.पी.पी.अंभोरे, अबरार मिर्झा, डॉ.विशाल सोमटकर, माणिक भगत, विरेंद्र देशमुख, दादाराव देशमुख, दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सदस्या गजानन भोने, परशरामजी भोयर, गजानन गोटे, रमेश पाचपिल्ले, शशिकांत टनमने,  किसनराव घुगे, संदीप घुगे, मोहन इंगोले,  सुरेश शिंदे, मिलींद पाकधने, राजेश जाधव, दिलीप भोजराज, वामनराव मारोती अगवे, रमेश लांडकर, फारुक अली, प्रा.संतोष दिवटे, राजु घोडीवाले,  सुधीर गोळे, गजानन बाजड सरपंच नावली, कुंडलीकराव वानखेडे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारdroughtदुष्काळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस