शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

शेतमालाची आयात रोखण्यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक!-योगगुरू रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:01 IST

कारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले.

ठळक मुद्दे योगगुरू रामदेव बाबांचे प्रतिपादन : कारंजा येथील शेतकरी मेळावा उत्साहात

लोकमत न्युज नेटवर्ककारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले.आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पुढाकाराने पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती तसेच भारत स्वाभिमान यांच्या आयोजित कारंजा येथील महावीर ब्रम्हचारी आश्रम परिसरात आयोजित  शेतकरी मेळाव्याला राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्याचे कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राजेंद्र पाटणी, पतंजली योग समितीचे रूपेश लढा विष्णू भुतडा, किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी राधेश्याम धूत, महिला पतंजली योग्य समितीच्या भारती शेंडे, शंकर नागापुरे, राम व्यवहारे, भाजपा तालुका अध्यक्ष राजीव काळे आदींची उपस्थिती होती. स्वामी रामदेव बाबा म्हणाले की, शेतकºयांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीचा वापर करावा. कमी खर्च लागणारे अलवेरा, गुळवेल, आवळा, कोरफळ आदी वनस्पतींसारखी पिके घेऊन शेती करावी. या वनस्पतीला आम्ही भाव देऊन शेतकरी सुखी बनवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या देशामध्ये विदेशी शेतकºयांची हकालपट्टी झाली पाहिजे. आपण पाळलेल्या गाईचे गोमूत्र आम्ही ८ ते १० रुपये लिटरने विकत घेतो. गायीच्या तुपालासुद्धा महत्त्व असल्याचे सांगून, गोमूत्रावरसुद्धा प्रक्रिया करून आरोग्यासाठी गोमूत्राचे महत्त्व विषद केले. शेतकºयांच्या हितासाठी किसान सेवा समिती पुढे होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानाची गरज असल्याने विद्यमान सरकार शेतकºयांसाठी योजना बनवेलच, असा आशावादही रामदेव बाबांनी व्यक्त केला. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामुळे कांरजा शहरात येण्याचा योग आला असल्याचा आवर्जुन उल्लेख करत योगगुरूने आमदार पाटणी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी रामदेव बाबांनी उपस्थिताना योगाचे धडे दिले तसेच व्यसनमुक्त या विषयावर मार्गदर्शन केले.प्रास्ताविकेतून आमदार पाटणी यांनी कारंजा तालुक्यातील शेतकºयांची परिस्थिती मांडली. आपल्या किसान पतंजली समितीकडून शेतकºयांना मदतीची गरज आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या शेतकºयांना धीर देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यानंतर पाशा पटेल म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी हा शेतात राबराब राबत आहे. तरीसुद्धा संसाराचा आर्थिक खर्च शेतीवर भागवू शकत नाही. यामुळे शेतकºयांना आत्महत्या करावी लागते. शेतकºयांच्या या परिस्थितीला सरकारी धोरण जबाबदार आहे. भारत सरकारने पशुधनासाठी दहा हजार कोटी रुपयांचे बजेट केले आहे. जीवन सुखी करण्यासाठी शेतकºयांनी पशुधनाचा वापर करून सेंद्रिय शेती करावी, असा सल्ला त्यांनी दिला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्येक शेतकºयाने कमी खर्चात शेती करून सेंद्रिय शेतीकडे वळावे, असा सल्ला दिला. शेतकरी मेळावा व अन्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी मित्र मंडळ, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत व पतंजली किसान सेवा समिती, भारत स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांचा सन्मान रामदेव बाबा यांनी केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. मेळाव्याला शेतकºयांसह महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :washimवाशिमYogaयोग