अभियानाच्या जनजागृतीसाठी धावणार प्रचाररथ
By Admin | Updated: April 15, 2015 01:11 IST2015-04-15T01:11:43+5:302015-04-15T01:11:43+5:30
जलयुक्त शिवार अभियान; वाशिम जिल्हा प्रशासनाच्या दोन प्रचार रथांचे उद्घाटन.

अभियानाच्या जनजागृतीसाठी धावणार प्रचाररथ
वाशिम : राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामधील योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जलसंधारणाच्या इतर योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या दोन प्रचाररथांचे उदघाटन आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी व जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक विजय चवाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रचाररथांवर लावण्यात आलेले फलक व माहितीपत्रके, चित्रफीत, ध्वनीफितीद्वारे जलसंधारणाच्या सर्व योजनांची माहिती लोकांपयर्ंत पोहचवली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जलसंधारणाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोणती कामे घेता येतात व त्यामुळे कोणता फायदा होतो, याविषयीची माहितीचा यामध्ये समावेश आहे, असे रोहयोचे उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २00 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या सर्व गावांमधील लोकांपयर्ंत अभियानाची माहिती पोहोचावी आणि त्यामध्ये लोकसहभाग वाढावा, हा या प्रचाररथांचा मुख्य उद्देश असून १ मे २0१५ पयर्ंत ही प्रचार मोहीम सुरु राहणार आहे. कृषी विभाग व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यंत्रणेचे अधिकारी या प्रचाररथाबरोबर राहून लोकांना विविध योजनांची माहिती देणार आहेत.