रिठद परिसरातील ११ गावांचा विद्युत पुरवठा खंडित
By Admin | Updated: May 9, 2016 01:54 IST2016-05-09T01:54:05+5:302016-05-09T01:54:05+5:30
तांत्रिक बिघाड कारणीभूत.

रिठद परिसरातील ११ गावांचा विद्युत पुरवठा खंडित
रिठद (जि. वाशिम): तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून रिठद परिसरातील ११ गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. रविवारी रात्रीपर्यंंतही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. रिठद वीज उपकेंद्रावरून रिठद, आसेगावपेन, येवती, कोयाळी खुर्द व कोयाळी बु., बेलखेडा, चिचांबापेन, देऊळगाव बंडा यासह एकूण ११ गावांना वीज पुरवठा होतो. गत तीन-चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ६ व ७ मे रोजी रिठद परिसरात विजेचा दाब जास्त झाल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली. ८ मे रोजी दुपारी १२ वाजतानंतर तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापयर्ंतही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. अनियमित वीज पुरवठा असल्याने परिसरातील ११ गावांतील नागरिक वैतागून गेले आहेत.