शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : दरवर्षीच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई मिळते. दरम्यान, ...

वाशिम : दरवर्षीच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना भरपाई मिळते. दरम्यान, किचकट प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. या सर्व विमा कंपन्यांच्या मनमानीला आता ब्रेक लागणार असून, कृषी आयुक्तालयाकडून सुचविलेल्या सहा पर्यायांद्वारे शेतकरी विमा कंपन्यांना नुकसानाबाबत पूर्वसूचना देऊ शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतर, विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याबाबत ७२ तासांच्या आत मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करून संबंधित विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल नसल्यामुळे, तसेच नेटवर्क, सर्व्हर डाऊन, अशा विविध तांत्रिक समस्यांमुळे शेतकरी नुकसानाची पूर्वसूचना ७२ तासांत देऊ शकत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींना आता ब्रेक लागणार आहे.

--------------------------

आधी हे होते दोन पर्याय

१ ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, ते शेतकरी संबंधित विमा कंपन्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून नुकसानाची सूचना देत होते. मात्र, भ्रमणध्वनीवर अनेक शेतकऱ्यांचा संपर्कच होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंद होत नव्हती.

२) मोबाइल ॲपद्वारे नुकसानीबाबत माहिती सादर करून, तसेच त्या ॲपमध्ये नुकसानीचे फोटो अपलोड करून माहिती सादर करण्यात येत होती.

---------------------

४१०० हेक्टर क्षेत्रावर नुकसान

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दि. ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने जवळपास ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तसेच जुलै महिन्यातही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने ३२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

-----------------------------

कोट

नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण म्हणून विमा काढला जातो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे राहू नयेत, यासाठी टोल फ्री क्रमांक, ई-मेल, मंडळ कृषी कार्यालय, विमा कंपनी आदींशी संपर्क साधता येतो. शेतकऱ्यांना जो पर्याय सोयीस्कर ठरेल, त्यानुसार ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती नोंदवावी.

-एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

---------------------

हे आहेत पर्याय

क्रॉप इन्शुरन्स ॲप

विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक

विमा कंपनीचा ई-मेल

विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय

कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय

ज्या बँकेत विमा जमा केला, ती बँक शाखा