शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

निवडणुकीतील पराजयावर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 3:40 PM

निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होतील, यापासून कोणता बोध घ्यावा या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.

- संतोष वानखडे वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणूक निकालाने काँग्रेस आघाडीवर चिंतनाची वेळ आणली असून, शिवसेना-भाजपा युतीच्या गोटात उत्साह निर्माण केला. या निवडणूक निकालाचे आगामी विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकांवर काय परिणाम होतील, यापासून कोणता बोध घ्यावा या अनुषंगाने राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर १ लाख १९ हजार ९३९ मतांची आघाडी घेत शिवसेनेचा गड पाचव्यांदा कायम राखला आहे. निवडणुकीदरम्यानचे विरोधकांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवित यवतमाळ-वाशिम मतदारसंघ हा शिवसेनेचा अभेद्य गड असल्याचे गवळी यांच्या विक्रमी मताधिक्क्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील वाशिम विधानसभा मतदारसंघात २४ हजाराची तर कारंजा विधानसभा मतदारसंघात ३६३४ मतांची आघाडी घेत आगामी विधानसभा निवडणुक ही काँग्रेस आघाडीसाठी कठीण असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुतोवाचही केले. शिवसेनेच्या विजयापेक्षा काँग्रेस आघाडीच्या दारूण पराभवामागील कारणीमिमांसेसंदर्भात राजकीय क्षेत्रात चर्चा झडत आहेत. चार, पाच महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत; त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक केव्हा लागेल, याचाही नेम नाही. ऐनवेळी कोणताही धोका नको म्हणून लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा हा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम ठेवण्याच्या दृष्टिने सेना, भाजपा पदाधिकारी लवकरच कामाला लागतील, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी काँग्रेसतर्फे लवकरच बैठक बोलावली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. लोकसभा निवडणुकीत कुठे कमी पडलो, मतदारांची नाडी ओळखण्यात कुठे चुक झाली याचे चिंतन करण्याबरोबरच या पराभवातून सावरण्यासाठी काँग्रेस आघाडीने आतापासूनच ‘ग्राऊंड लेव्हल’वर हालचाली कराव्या, असा सूरही काँग्रेसमधून उमटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत मतदारांनी परत एकदा शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिले आहे. आगामी निवडणुकीतही मतदारांचा कौल हा भाजपा सरकारने केलेल्या विकासाच्या बाजूनेच राहिल.- राजेंद्र पाटणीजिल्हाध्यक्ष, भाजपायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पराभवामागील कारणीमिमांसा केली जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्यावतीने लवकरच मंथन, चिंतन केले जाईल.-अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल