शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

खोटारड्या भाजपा-सेना सरकारने जनतेची केली दिशाभूल - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:27 IST

पाच वर्षात अक्षरश: लूट करणाऱ्या खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यभरातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम /कारंजा : जनतेला खोट्या आश्वासनांच्या झुल्यावर झुलवून गत पाच वर्षात अक्षरश: लूट करणाऱ्या खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यभरातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले यांनी केला. अशाच काही चुकीच्या कामांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सरकारचे वस्त्रहरण करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.कॉंग्रेसकडून आयोजीत महापदार्फाश यात्रेचे कारंजा व वाशिम येथे ३ सप्टेंबर रोजी आगमन झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँंग्रेस कमेटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकुर, आमदार वझाहत मिर्झा, प्रकाशराव साबळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक, दिलीप भोजराज यांच्यासह जिल्हायातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वाशिम व कारंजा येथे झालेल्या महा पर्दापफाश सभेत नाना पटोले म्हणाले, एसटी बसने महाराष्ट्रातील ६७ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. ते प्रत्येकी एक रूपया विम्यापोटी शासनाकडे भरतात, म्हणजेच सरकारकडे ६७ लाख रुपये रोज जमा होतात. त्या रकमेचे नेमके काय केले जाते, याचे उत्तर युती सरकारला अद्यापपर्यंत देता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या सरकारने लुट सुरू केली असून, शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत राबविली. आता काही दिवसात आचारसंहिता लागणार मग भरतीचे काय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारकडून जनतेला फसवण्याचे काम सुरू असून, हे सरकार शेतकरी विरोधी, भुलथापा मारणारे असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश' यात्रेतून करण्यात येत असलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने ही यात्रा काढली असल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच सत्तर वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढे खोटारडे पंतप्रधान व मुख्यमंत्री पाहिले नाहीत. ज्या प्रश्नांवर सत्ता मिळविली ते प्रश्न बाजुला ठेवून इतर प्रकरणे समोर करुन भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे.

भाजप पक्ष संपूर्ण काँग्रेस-राष्टÑवादीमय झाला - ठाकुरभाजपा सरकार खोटारडे सरकार असून लोकांची दिशाभूल करीत आहे. भाजपा हिंदू राष्टÑ निर्माण करायचे आहे म्हणतेय मग इतर लोकांनी कुठ जायचं असा प्रश्न करीत त्यांच्या पक्षात दमदार नेतृत्व नसल्याने ते अन्य पक्षातील लोकांची आयात करीत आहेत. यामुळेच भाजपा संपूर्ण काँग्रेस-राष्टÑवादीमय झाल्याचे यशोमती ठाकुर म्हणाल्यात.

नेत्यांना भीती दाखवून भाजपात प्रवेश करण्यास पाडताहेत भाग- ठाकरेभाजपामध्ये विविध पक्षाचे नेते प्रवेश करीत आहेत. ते स्वताहून नव्हे तर त्यांना तुम्ही आले नाही तर तुमचे प्रकरण पुढे येईल अशी भीती दाखविण्यात येत आहे. तर काही जण आपला स्वार्थ पाहून जात असल्याचे माणिकराव ठाकरे भाषणात म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणwashimवाशिम