शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खोटारड्या भाजपा-सेना सरकारने जनतेची केली दिशाभूल - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:27 IST

पाच वर्षात अक्षरश: लूट करणाऱ्या खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यभरातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम /कारंजा : जनतेला खोट्या आश्वासनांच्या झुल्यावर झुलवून गत पाच वर्षात अक्षरश: लूट करणाऱ्या खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यभरातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले यांनी केला. अशाच काही चुकीच्या कामांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सरकारचे वस्त्रहरण करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.कॉंग्रेसकडून आयोजीत महापदार्फाश यात्रेचे कारंजा व वाशिम येथे ३ सप्टेंबर रोजी आगमन झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँंग्रेस कमेटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकुर, आमदार वझाहत मिर्झा, प्रकाशराव साबळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक, दिलीप भोजराज यांच्यासह जिल्हायातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वाशिम व कारंजा येथे झालेल्या महा पर्दापफाश सभेत नाना पटोले म्हणाले, एसटी बसने महाराष्ट्रातील ६७ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. ते प्रत्येकी एक रूपया विम्यापोटी शासनाकडे भरतात, म्हणजेच सरकारकडे ६७ लाख रुपये रोज जमा होतात. त्या रकमेचे नेमके काय केले जाते, याचे उत्तर युती सरकारला अद्यापपर्यंत देता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या सरकारने लुट सुरू केली असून, शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत राबविली. आता काही दिवसात आचारसंहिता लागणार मग भरतीचे काय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारकडून जनतेला फसवण्याचे काम सुरू असून, हे सरकार शेतकरी विरोधी, भुलथापा मारणारे असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश' यात्रेतून करण्यात येत असलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने ही यात्रा काढली असल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच सत्तर वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढे खोटारडे पंतप्रधान व मुख्यमंत्री पाहिले नाहीत. ज्या प्रश्नांवर सत्ता मिळविली ते प्रश्न बाजुला ठेवून इतर प्रकरणे समोर करुन भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे.

भाजप पक्ष संपूर्ण काँग्रेस-राष्टÑवादीमय झाला - ठाकुरभाजपा सरकार खोटारडे सरकार असून लोकांची दिशाभूल करीत आहे. भाजपा हिंदू राष्टÑ निर्माण करायचे आहे म्हणतेय मग इतर लोकांनी कुठ जायचं असा प्रश्न करीत त्यांच्या पक्षात दमदार नेतृत्व नसल्याने ते अन्य पक्षातील लोकांची आयात करीत आहेत. यामुळेच भाजपा संपूर्ण काँग्रेस-राष्टÑवादीमय झाल्याचे यशोमती ठाकुर म्हणाल्यात.

नेत्यांना भीती दाखवून भाजपात प्रवेश करण्यास पाडताहेत भाग- ठाकरेभाजपामध्ये विविध पक्षाचे नेते प्रवेश करीत आहेत. ते स्वताहून नव्हे तर त्यांना तुम्ही आले नाही तर तुमचे प्रकरण पुढे येईल अशी भीती दाखविण्यात येत आहे. तर काही जण आपला स्वार्थ पाहून जात असल्याचे माणिकराव ठाकरे भाषणात म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणwashimवाशिम