शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मानोऱ्यात विराट मोर्चा!

By सुनील काकडे | Updated: January 31, 2024 17:46 IST

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी उतरले रस्त्यावर.

सुनील काकडे, मानोरा : सुरूवातीला ओल्या व नंतर कोरड्या दुष्काळामुळे संपूर्ण शेतीपिके वाया गेली. उरल्या-सुरल्या पिकांची अवकाळी पावसाने नासाडी केली. गतवेळच्या खरीप हंगामात काहीच पिकले नसल्याने प्रशासनानेही ४८ पैसे आणेवारी काढली. मात्र, दुष्काळ जाहीर केला नाही. या अन्यायाविरोधात संतप्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील मानोरा येथे ३१ जानेवारीला तहसिल कार्यालयावर सोटा मोर्चा काढला.

जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी व अवकाळीची मदत मिळाली नाही, पीकविम्याचीही मदत तकलादू ठरली. दिवसा विज पुरवठा खंडीत केला जात असून रात्रीला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पिके उध्वस्त करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा त्यांना मारण्याची परवानगी द्यावी, शेतक-यांची थट्टा थांबली नाही तर वारंवार रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देवानंद पवार यांनी दिला.

शिवसेनेचे (उबाठा) नेते तथा माजी मंत्री संजय देशमुख यांनीही सरकारवर हल्ला चढविला. राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार अनंतकुमार पाटील, आमदार अमित झनक, शिवसेनेचे अनिल राठोड, राष्ट्रवादीचे अरविंद पाटील इंगोले यांनीही मनोगत व्यक्त केले. मोर्चात बलदेव महाराज, दिलीप सरनाईक, दिलीप भोजराज, चंद्रकांत गोटे, वैभव सरनाईक, गजानन अमदाबादकर, रविंद्र पवार, कांशीराम राठोड, नंदाताई गणोद, इफ्तेखार पटेल, गजानन राठोड, अमोल तरोडकर, अशोक करसडे, नंदाताई तायडे, वसंतराव भगत, महेश जाधव, रामनाथ राठोड, हाफीज खान, बरखा बेग यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी हाती घेतले सोटे!

विविध स्वरूपातील संकटांनी जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी मानोरा येथे निघालेल्या सोटा मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांच्या हातात सोटे असल्याचे पाहावयास मिळाले.

टॅग्स :washimवाशिमFarmers Protestशेतकरी आंदोलन