शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

खाजगी बाजारात कापूस खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 2:20 PM

वाशिम: कपाशीची पहिली वेचणी आटोपल्यानंतर जिल्ह्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कपाशीची पहिली वेचणी आटोपल्यानंतर जिल्ह्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. व्यापारयांकडून कपाशीला ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर देण्यात येत असल्याने यंदाही शासकीय खरेदी केंद्रांना कापूस मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे.गतकाही वर्षांप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात विविध नैसर्गिक संकटाचा फटका कपाशीला बसला असून, बहुतांश शेतकºयांना या पिकावर केलेला खर्चही वसुल होणे कठीण असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा या पिकाची पेरणी ४० टक्क्यांनी घटली. गतवर्षी ३० हजार ५०० हेक्टर असलेले कपाशीचे क्षेत्र यंदा १८ हजार ६०० हेक्टरवर आले. जिल्ह्यात कपाशीची पहिली वेचणी पूर्ण झाली असून, शेतकरी कापूस खरेदीला सुरुवात होण्याची प्रतिक्षा करीत असताना जिल्ह्यात व्यापाºयांकडून दिवाळीच्या मुहुर्तावर कापूस खरेदी सुरू करण्यात आली. शासनाने कपाशीसाठी मध्यम धाग्याच्या कपाशीला ५ हजार १५० आणि लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ५४५० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव जाहीर केले आहेत. त्यात यंदा कापूस बाजार तेजीत असल्याने व्यापाºयांकडून चांगल्या आणि लांब धाग्याच्या कापसाला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचे दर देण्यात येत आहेत. अर्थात हमीदरापेक्षा व्यापाºयांकडून १ हजार रुपये अधिक दर मिळत् असल्याने शेतकरी वर्गाने व्यापाºयांकडे कापूस विक्रीसाठी घाई सुरू केली आहे. दरम्यान, शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास अद्याप वेळ असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच कापूस विकण्याचीही घाई करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस