नादुरुस्त रोहित्र शेतक-यांच्या मुळावर!
By Admin | Updated: August 29, 2016 00:15 IST2016-08-29T00:15:03+5:302016-08-29T00:15:03+5:30
कृषी पंपांचे १00; तर गावठाणचे ३0 रोहित्र नादुरुस्त; महावितरणची डोकेदुखी वाढली.

नादुरुस्त रोहित्र शेतक-यांच्या मुळावर!
सुनील काकडे
वाशिम, दि. २८: गत १५ दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. अशातच कृषी पंपांचे १00 आणि गावठाणचे ३0 विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकर्यांच्या समस्येत अधिकच भर पडली. जलाशय, सिंचन प्रकल्प व विहिरींमध्ये पाणी असतानाही विद्युत पुरवठय़ाअभावी पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्हा विजेसंदर्भातील समस्यांमध्ये पूर्वीपासूनच 'डेंजर झोन'मध्ये राहिला आहे. ग्रामीण भागात वीज वाहिन्यांवर ह्यआकोडेह्ण टाकून वीज चोरी करणे, विना ह्यकॅपेसिटरह्ण तथा नियमबाहय़ पद्धतीने ह्यऑटो स्विचह्णचा वापर करून एकाचवेळी अनेकांकडून कृषी पंपाद्वारे वीज घेणे, आदी बेकायदेशीर प्रकारांमुळे ग्रामीण भागातील ह्यट्रान्सफार्मरह्ण वारंवार नादुरुस्त होत आहेत. याशिवाय ह्यथ्री फेज ट्रान्सफार्मरह्णमधून कुठलाही एक ह्यफेजह्ण नादुरुस्त झाल्यास लगेच दुसर्या ह्यफेजह्णवरून विद्युत पुरवठा घेतला जातो, तो ह्यफेजह्ण बंद पडल्यास तिसर्या ह्यफेजह्णचा वापर केला जात असल्याने त्याचा थेट परिणाम कृषी पंपाला पुरविल्या जाणार्या विजेसोबतच गावठाण फिडरवरही जाणवत आहे. नादुरुस्त होणारे रोहित्र दुरुस्त होऊन यायला बराच वेळ लागत असल्याने पिकांचे नुकसान होण्यासोबतच गावेच्या गावे विद्युतअभावी अंधारात राहत आहेत. सद्य:स्थितीत वाशिम जिल्हय़ात कृषी पंपांना वीजपुरवठा करणारे सुमारे १00 रोहित्र नादुरुस्त असून गावठाण फिडरवरील ३0 रोहित्र बंद पडले आहेत. परिणामी, जवळपास १0 गावे अंधारात चाचपडत आहेत. यामुळे संबंधित गावांमधील विजेवर चालणारी सर्वच उपकरणे बंद पडली असून आटा चक्की बंद राहत असल्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे विदारक वास्तव निर्माण झाले आहे.
दरम्यान, नादुरुस्त असलेले जिल्हय़ातील रोहित्र दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रामीण भागातील जनतेने संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बन्सोडे यांनी केले.
ऑटो स्विचमुळे उद्भवली समस्या
ग्रामीण भागातील शेतांमध्ये असणारे कृषी पंप सुरू करण्यासाठी बहुतांश शेतकर्यांनी
ऑटो स्विचची पद्धत अवलंबिली आहे. भारनियमनामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर एकाचवेळी अनेकांकडून ह्यऑटो स्विचह्णचा वापर होत असल्याने ह्यट्रान्सफार्मरह्णवर अतिरिक्त भार पडतो आणि रोहित्र जळणे अथवा तांत्रिक कारणांमुळे जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याशिवाय कृषी पंपांना कॅपेसिटर बसविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने रोहित्रांवर ३0 टक्के अधिकचा लोड वाढत आहे. रोहित्रांची क्षमता नसताना सकाळच्या सुमारास ग्रामीण भागातील बहुतांश घरांमध्ये सर्रासपणे अधिक लोड खेचणारे ह्यहिटरह्ण सुरू होत असल्यानेही रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार उद्भवतात. याकडे संबंधितांनी विशेष लक्ष पुरवायला हवे.
रोहित्र जळणे अथवा नादुरुस्त होण्याचे प्रकार वाशिम जिल्हय़ात वाढीस लागले आहेत. यामागील कारणांचा शोध घेतला असता, नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रकर्षाने अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत अपेक्षित जनजागृती केली जात असून नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कारवाईदेखील युद्धस्तरावर सुरू आहे.
- दत्तात्रेय बनसोडे
अधीक्षक अभियंता, महावितरण