शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नादुरुस्त बस ठरताहेत जीवघेण्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:27 IST

सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ४ एस.टी. आगार आणि २ उपआगार असून याअंतर्गंत २५० पेक्षा अधिक एस.टी. बसेस दैनंदिन रस्त्यावर धावतात; मात्र त्यातील अधिकांश बसेस नादुरुस्त राहत असून प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या प्रकाराला प्रवासी पुरते वैतागले आहेत. सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. याचदिवशी वाशिमच्या भर चौकात वाशिम-रिसोड ही बस नादुरूस्त झाल्याने प्रवाशांना दुसºया पर्यायी बसने प्रवास करावा लागला.‘प्रवाशांच्या सोयीसाठी’, हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाºया राज्य परिवहन महामंडळाचा कारभार मात्र जुन्याच एस.टी. बसेसच्या माध्यमातून सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर हे चार आगार असून मालेगाव उपआगाराचा कारभार वाशिम; तर मानोरा उपआगाराचा कारभार मंगरूळपीर आगारातून चालतो. आजमितीस चारही आगारांकडे असलेल्या बहुतांश एस.टी. बसेस जुनाट झाल्या असून प्रवासादरम्यान टायर पम्चर होण्यासह अन्य स्वरूपात अचानक बिघाड होऊन बस मध्येच बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाशिममार्गे अकोलाकडे जाणाºया एम.एच. १४ बी.टी. ४७५८ या उमरखेड-शेगाव बसचे ‘ब्रेक’ मालेगाव तालुक्यातील मेडशी गावानजिक अचानक निकामी झाले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टीनशेडमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने या घटनेत एक प्रवासी जखमी होण्याचा अपवाद वगळता अन्य कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याचदिवशी वाशिम आगारातून रिसोड येथे जाणारी एम.एच. ४० एन. ८९४३ या क्रमांकाची वाशिम-रिसोड बस पाटणी चौक ते आंबेडकर चौक मार्गावर भर रस्त्यात नादुरूस्त झाल्याने वाहकाने सर्व प्रवाशांना बसखाली उतरून दिले. मागून येत असलेल्या दुसºया बसचा पर्याय मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय टळली; मात्र यासारख्या घटनांमुळे एस.टी.च्या प्रवासाला नागरिक कंटाळल्याचा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे.

१० ते १२ लाख किलोमिटर किंवा १० वर्षापर्यंत एस.टी. बस चालवावी लागत असल्याचा नियम आहे. आगारांतर्गत धावणाºया एस.टी. बसेसला आजमितीस १० वर्षे पूर्ण होत असून गत पाच वर्षांपासून नव्याने एकही बस मिळालेली नाही. त्यामुळे जुन्याच बसेसवर कारभार हाकावा लागत आहे. दुसरीकडे रस्ते प्रचंड खराब झाल्याने १ लाख किलोमिटर प्रवासानंतर बदलावा लागणारा टायर सद्या १० ते १२ हजार किलोमिटरपर्यंतच चालत असून कर्मचारीही हैराण झाले आहेत.- विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी