शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नादुरुस्त बस ठरताहेत जीवघेण्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:27 IST

सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ४ एस.टी. आगार आणि २ उपआगार असून याअंतर्गंत २५० पेक्षा अधिक एस.टी. बसेस दैनंदिन रस्त्यावर धावतात; मात्र त्यातील अधिकांश बसेस नादुरुस्त राहत असून प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या प्रकाराला प्रवासी पुरते वैतागले आहेत. सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. याचदिवशी वाशिमच्या भर चौकात वाशिम-रिसोड ही बस नादुरूस्त झाल्याने प्रवाशांना दुसºया पर्यायी बसने प्रवास करावा लागला.‘प्रवाशांच्या सोयीसाठी’, हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाºया राज्य परिवहन महामंडळाचा कारभार मात्र जुन्याच एस.टी. बसेसच्या माध्यमातून सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर हे चार आगार असून मालेगाव उपआगाराचा कारभार वाशिम; तर मानोरा उपआगाराचा कारभार मंगरूळपीर आगारातून चालतो. आजमितीस चारही आगारांकडे असलेल्या बहुतांश एस.टी. बसेस जुनाट झाल्या असून प्रवासादरम्यान टायर पम्चर होण्यासह अन्य स्वरूपात अचानक बिघाड होऊन बस मध्येच बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाशिममार्गे अकोलाकडे जाणाºया एम.एच. १४ बी.टी. ४७५८ या उमरखेड-शेगाव बसचे ‘ब्रेक’ मालेगाव तालुक्यातील मेडशी गावानजिक अचानक निकामी झाले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टीनशेडमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने या घटनेत एक प्रवासी जखमी होण्याचा अपवाद वगळता अन्य कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याचदिवशी वाशिम आगारातून रिसोड येथे जाणारी एम.एच. ४० एन. ८९४३ या क्रमांकाची वाशिम-रिसोड बस पाटणी चौक ते आंबेडकर चौक मार्गावर भर रस्त्यात नादुरूस्त झाल्याने वाहकाने सर्व प्रवाशांना बसखाली उतरून दिले. मागून येत असलेल्या दुसºया बसचा पर्याय मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय टळली; मात्र यासारख्या घटनांमुळे एस.टी.च्या प्रवासाला नागरिक कंटाळल्याचा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे.

१० ते १२ लाख किलोमिटर किंवा १० वर्षापर्यंत एस.टी. बस चालवावी लागत असल्याचा नियम आहे. आगारांतर्गत धावणाºया एस.टी. बसेसला आजमितीस १० वर्षे पूर्ण होत असून गत पाच वर्षांपासून नव्याने एकही बस मिळालेली नाही. त्यामुळे जुन्याच बसेसवर कारभार हाकावा लागत आहे. दुसरीकडे रस्ते प्रचंड खराब झाल्याने १ लाख किलोमिटर प्रवासानंतर बदलावा लागणारा टायर सद्या १० ते १२ हजार किलोमिटरपर्यंतच चालत असून कर्मचारीही हैराण झाले आहेत.- विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी