शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ऑनलाईन शिक्षणामुळे गरीब विद्यार्थ्यांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 4:47 PM

गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्युज नेटवर्ककारंजा (वाशिम): कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदाचे शैक्षणिक सत्र अद्यापही पूर्णपणे सुरू झाले नाही. त्यात खासगी शाळांनी ऑनलाईन पद्धतीचा आधार घेतला; परंतु गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन घेण्याएवढी रक्कम नसतानाच शाळांकडून अतिरिक्त शुल्कही वसूल करण्याचा प्रकार होत असल्याने गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात पाहायला मिळत आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे शासकीय शाळा बंदच आहेत. काही खासगी शाळा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करीत आहेत; परंतु ऑनलाईन पद्धतीच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क वसुली करण्याचा प्रकार कारंजात पाहायला मिळत आहे. त्यातच गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन घेऊन देण्याची ऐपत पालकांची नसल्याने गरीब विद्यार्थी शिक्षणात मागे पडत आहेत. काही शाळांना शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळत असतानही कारंजा शहरातील नामांकीत शाळा अद्यापही डोनेशनचा अट्टाहास करीत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना अध्ययन आणि शाळेसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा अधिक वेळ ऑनलाईनच्या अभ्यासात गुतूंन राहावे लागत असून, काही शाळांकडून सकाळी ७.२५ पासून मधल्या काळातील अर्धातास वगळता ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनवर अध्ययनासाठी गुंतवून ठेवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणाºयाची शक्यता निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने याची चौकशी करण्याची मागणी पालक करीत आहेत.

कारंजातील शाळा विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेत असल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे अद्याप आली नाही. पालकांनी न घाबरता आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. -सुरेश अघडते,गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती कारंजा लाड

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र