शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यप्राण्यांचा गाळात फसून जातोय जीव; तीन निलगाईचा बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:52 IST

वाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसताना प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसतानाच प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात अवघ्या महिनाभरात तीन निलगार्इंचा गाळात फसून मृत्यू झाला; परंतु वनविभागाला पंचनाम्याखेरीज काही करता आले नाही. वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचे क्षेत्र लक्षणीय असून, काटेपूर्णा आणि सोहळ काळविट अभयारण्येही जिल्ह्यात आहेत. प्रादेशिक जंगलासह अभयारण्याच्या क्षेत्रात बिबट, अस्वल, तरस, कोल्हा, रानडुक्कर या हिंस्त्र वन्यप्राण्यांसह निलगाय, हरीण, काळविट, माकड, ससा, आदिसारख्या शाकाहारी वन्यजीवांची संख्या लाखाहून अधिक आहे. तथापि, जैवविविधेत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी तर सोडाच; परंतु संरक्षणासाठीही वनविभागाकडून आवश्यक प्रमाणात कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. तकलादू उपायांवर भर देण्यात धन्यता मानली जात आहे. वन्यजिवांसाठी सर्वात आवश्यक अशा पाणवठ्यांच्या निर्मितीबाबत कमालीची उदासीनता दिसत आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आधीच कमी असताना वनविभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी टाकण्यात येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील वन्यजिवांचा अधिवास धोक्यात असताना त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. जंगलात पाणी नसल्याने वन्यजीव शेतशिवार किंवा प्रकल्पांकडे पाण्यासाठी धाव घेत असून, यामुळे त्यांचा जीव संकटात सापडत आहेत. शेतशिवारात कधी विहिरीत पडून, तर कधी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात, तर कधी रस्ता अपघातात जखमी झाल्याने कित्येक वन्यजीवांचे बळी गेले आहेत. आता प्रकल्पांत मृतसाठा उरला असताना या प्रकल्पांवर पाणी पिण्यास जाणारे वन्यजीव गाळात फसून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी गाळात फसलेल्या वन्यजीवांना वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी बाहेर काढले आहे; परंतु काही ठिकाणी गाळात फसलेल्या वन्यजिवांचा मृत्यू झाल्यानंतरच वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करायला जात असल्याचेही दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात महिनाभरात महिनाभरात तीन निलगाई प्रकल्पाच्या गाळात फसून दगावल्या. त्यात ८ ते १० दिवसांपूर्वी गाळात फसून मृत्यू झालेल्या एका निलगाईचा केवळ सांगाडा उरल्यानंतरच वनविभागाने पंचनामा के ला आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई