शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यप्राण्यांचा गाळात फसून जातोय जीव; तीन निलगाईचा बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:52 IST

वाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसताना प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसतानाच प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात अवघ्या महिनाभरात तीन निलगार्इंचा गाळात फसून मृत्यू झाला; परंतु वनविभागाला पंचनाम्याखेरीज काही करता आले नाही. वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचे क्षेत्र लक्षणीय असून, काटेपूर्णा आणि सोहळ काळविट अभयारण्येही जिल्ह्यात आहेत. प्रादेशिक जंगलासह अभयारण्याच्या क्षेत्रात बिबट, अस्वल, तरस, कोल्हा, रानडुक्कर या हिंस्त्र वन्यप्राण्यांसह निलगाय, हरीण, काळविट, माकड, ससा, आदिसारख्या शाकाहारी वन्यजीवांची संख्या लाखाहून अधिक आहे. तथापि, जैवविविधेत अनन्य साधारण महत्त्व असलेल्या या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी तर सोडाच; परंतु संरक्षणासाठीही वनविभागाकडून आवश्यक प्रमाणात कुठल्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. तकलादू उपायांवर भर देण्यात धन्यता मानली जात आहे. वन्यजिवांसाठी सर्वात आवश्यक अशा पाणवठ्यांच्या निर्मितीबाबत कमालीची उदासीनता दिसत आहे. नैसर्गिक जलस्त्रोत आधीच कमी असताना वनविभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी टाकण्यात येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील वन्यजिवांचा अधिवास धोक्यात असताना त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. जंगलात पाणी नसल्याने वन्यजीव शेतशिवार किंवा प्रकल्पांकडे पाण्यासाठी धाव घेत असून, यामुळे त्यांचा जीव संकटात सापडत आहेत. शेतशिवारात कधी विहिरीत पडून, तर कधी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात, तर कधी रस्ता अपघातात जखमी झाल्याने कित्येक वन्यजीवांचे बळी गेले आहेत. आता प्रकल्पांत मृतसाठा उरला असताना या प्रकल्पांवर पाणी पिण्यास जाणारे वन्यजीव गाळात फसून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी गाळात फसलेल्या वन्यजीवांना वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी बाहेर काढले आहे; परंतु काही ठिकाणी गाळात फसलेल्या वन्यजिवांचा मृत्यू झाल्यानंतरच वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करायला जात असल्याचेही दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात महिनाभरात महिनाभरात तीन निलगाई प्रकल्पाच्या गाळात फसून दगावल्या. त्यात ८ ते १० दिवसांपूर्वी गाळात फसून मृत्यू झालेल्या एका निलगाईचा केवळ सांगाडा उरल्यानंतरच वनविभागाने पंचनामा के ला आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई