शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

भाजीपाल्याला कवडीमोल भाव; उभ्या कोबी पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:32 IST

चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या दीड एकर शेतातील कोबीत जनावरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गामुळे संचारबंदी लागू असून, वाहतुकीचा प्रश्नही बिकट झाला आहे. या पृष्ठभूमीवर भाजीपाला विक्रेते संकटात सापडले असून, मातीमोल भाव मिळत असल्याने हताश होऊन मानोरा तालुक्यातील माहुली येथील शेतकरी चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी १२ एप्रिल रोजी आपल्या दीड एकर शेतातील कोबीत जनावरे सोडली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. संचारबंदी लागू असून, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे कठोर अंमलबजावणी केली जात आहे. शेतमालासह भाजीपाला विक्रीवरही काही प्रमाणात बंधने आली असल्याने शेतकºयांच्या भाजीपाल्याला अपेक्षीत भाव मिळत नाही. शेवटी हताश होण्याची वेळ तालुक्यातील अनेक शेतकºयांवर आली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे अपेक्षीत बाजारभाव मिळण्याची अपेक्षा उरली नाही असे माहुली येथील शेतकरी चुन्नीलाल उकंडा राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी आपल्या दीड एकर शेतात पानकोबीची लागवड केली. हजारो रुपये खर्च करून त्याचे संगोपन केले. परंतु कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे मजुराचा खर्चसुध्दा  निघत नाही. म्हणुन उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत, असे राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी