संतप्त सदस्यांचा सर्वसाधारण सभेत गोंधळ!
By Admin | Updated: May 11, 2016 03:07 IST2016-05-11T02:43:15+5:302016-05-11T03:07:22+5:30
वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभेला विलंब; ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध.

संतप्त सदस्यांचा सर्वसाधारण सभेत गोंधळ!
वाशिम: सर्वसाधारण सभेतील ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध आणि मंगळवारच्या सभेला होत असलेला प्रचंड विलंब पाहून संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहातील खुच्र्यांची अक्षरश: फेकाफेक केली. अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक सदस्यांच्या संयमाचा असा उद्रेक झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात १0 मे रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार होती. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल तीन तास झाल्यानंतरही सभागृहात कुणी येत नसल्याचे पाहून सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्य संतप्त झाले. संयमाचा बांध फुटल्याने संतप्त सदस्यांनी सभागृहातील मंचावरील खुच्र्यांची फेकफाक सुरू केली तसेच ह्यडायसह्ण लोटून दिले. विरोधी बाकावरील काही सदस्यांनी खिडक्यांच्या काचाही फोडल्या. सभागृहातील हा गदारोळ अधिकारी-पदाधिकार्यांच्या कानावर गेल्याने सर्व जण २ वाजता सभागृहात आले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य स्वप्निल सरनाईक, शिवदास राऊत, वाशिम पंचायत समितीचे सभापती वीरेंद्र देशमुख, जि.प. सदस्य रणजित जाधव, चिंतामन खुळे, अनिल कांबळे, उषा अनिल जाधव, रजनी महादेव ताटके, विश्वास गोदमले, गौरी पवार यांच्यासह सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांनी सभेला विलंब होत असल्याच्या घटनेचा निषेध नोंदविला.