शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अमरावती विभागातील ७२३९ गावांतील खरिपाचा नजरअंदाज जाहीर

By दिनेश पठाडे | Updated: September 30, 2023 12:58 IST

विभागाची हंगामी ६० पैसेवारी, पैसेवारीत पीक स्थिती उत्तम दाखविल्याने नाराजी 

वाशिम : अमरावती महसूल विभागात समाविष्ट असलेल्या त्या-त्या जिल्ह्याने खरीप हंगाम २०२३-२४ ची हंगामी नजरअंदाज  पैसेवारी काढली आहे. त्यानुसार विभागातील ७ हजार २३९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची पैसेवारी ५०  पैक्षा अधिक आहे. तर विभागाची एकूण पैसेवारी ६० आहे. 

अमरावतील विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ७ हजार ४०० एवढी आहे. त्यापैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या ७ हजार २३९ आहे. लागवडी योग्य असलेल्या गावांतील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पैसेवारी जिल्हास्तरावर काढण्यात आली. विभागात अकोला जिल्ह्याची सर्वात कमी ५७ पैसेवारी तर सर्वाधिक ६२ पैसेवारी ही वाशिम जिल्ह्याची निघाली आहे. विभागात ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे काही जिल्ह्यातील पीक परिस्थिती नाजूक झाली होती. नजरअंदाज हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे गृहित धरून पैसेवारी अधिक निघाल्याचे चित्र आहे.

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पीक उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये सुधारित आणि डिसेंबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत बदल करण्याचा वाव असल्याने पैसेवारी कमी निघेल अशी शक्यता आहे.  शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते. ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी आली तर या सर्व बाबींसाठी अनुकूल वातावरण असल्याचे मानले जाते. विभागात प्रमुख पिकांची स्थिती पैसेवारीत उत्तम स्थिती दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.   त्यामुळे विभागातील प्रत्येक जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सर्वात कमी पैसेवारी अकोला जिल्ह्याचीअमरावती विभागातील त्या-त्या जिल्ह्याने जाहीर केलेल्या पैसेवारीमध्ये सर्वात कमी पैसेवारी ही अकोला जिल्ह्याची निघाली असल्याचे दिसून येते. या जिल्ह्यातील १०१२ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या ९९० गावांची पैसेवारी ५७ एवढी काढण्यात आली आहे. तर सर्वाधिक पैसेवारी वाशिम जिल्ह्याची ६४ पैसेवारी निघाली आहे. अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याची  पैसेवारी अनुक्रमे ६०, ६१ व ६० एवढी आहे. आगामी सुधारित आणि अंतिम पैसेवारीत बदल होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी