शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अमरावती विभागातील ७२३९ गावांतील खरिपाचा नजरअंदाज जाहीर

By दिनेश पठाडे | Updated: September 30, 2023 12:58 IST

विभागाची हंगामी ६० पैसेवारी, पैसेवारीत पीक स्थिती उत्तम दाखविल्याने नाराजी 

वाशिम : अमरावती महसूल विभागात समाविष्ट असलेल्या त्या-त्या जिल्ह्याने खरीप हंगाम २०२३-२४ ची हंगामी नजरअंदाज  पैसेवारी काढली आहे. त्यानुसार विभागातील ७ हजार २३९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून सर्व गावांची पैसेवारी ५०  पैक्षा अधिक आहे. तर विभागाची एकूण पैसेवारी ६० आहे. 

अमरावतील विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या पाच जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या ७ हजार ४०० एवढी आहे. त्यापैकी लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या ७ हजार २३९ आहे. लागवडी योग्य असलेल्या गावांतील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पैसेवारी जिल्हास्तरावर काढण्यात आली. विभागात अकोला जिल्ह्याची सर्वात कमी ५७ पैसेवारी तर सर्वाधिक ६२ पैसेवारी ही वाशिम जिल्ह्याची निघाली आहे. विभागात ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिला, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. यामुळे काही जिल्ह्यातील पीक परिस्थिती नाजूक झाली होती. नजरअंदाज हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे गृहित धरून पैसेवारी अधिक निघाल्याचे चित्र आहे.

पावसाच्या दीर्घ खंडामुळे पीक उत्पादनात घट होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये सुधारित आणि डिसेंबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत बदल करण्याचा वाव असल्याने पैसेवारी कमी निघेल अशी शक्यता आहे.  शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोणतेही अनुदान, आर्थिक मदत, पिकविमा मिळण्यासाठी अनेक घटकांचा विचार केला जातो. यामध्ये पैसेवारीही खूप महत्त्वाची मानली जाते. ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी आली तर या सर्व बाबींसाठी अनुकूल वातावरण असल्याचे मानले जाते. विभागात प्रमुख पिकांची स्थिती पैसेवारीत उत्तम स्थिती दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.   त्यामुळे विभागातील प्रत्येक जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सर्वात कमी पैसेवारी अकोला जिल्ह्याचीअमरावती विभागातील त्या-त्या जिल्ह्याने जाहीर केलेल्या पैसेवारीमध्ये सर्वात कमी पैसेवारी ही अकोला जिल्ह्याची निघाली असल्याचे दिसून येते. या जिल्ह्यातील १०१२ गावांपैकी लागवडी योग्य असलेल्या ९९० गावांची पैसेवारी ५७ एवढी काढण्यात आली आहे. तर सर्वाधिक पैसेवारी वाशिम जिल्ह्याची ६४ पैसेवारी निघाली आहे. अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्याची  पैसेवारी अनुक्रमे ६०, ६१ व ६० एवढी आहे. आगामी सुधारित आणि अंतिम पैसेवारीत बदल होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी