शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
5
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
6
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
7
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
8
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
9
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
10
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
11
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
12
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
13
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
14
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
15
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
16
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
17
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
18
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
19
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
20
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?

२५ वर्षानंतर सोनगव्हाण गाव झाले पाणी टंचाईमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:41 IST

वाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले.

ठळक मुद्दे भौगोलिकदृष्टया  जरी हे गाव पैनगंगेच्या तिरावर वसलेले, परंतु हिवाळा संपताच त्या पैनगंगेचा प्रवाह दुषित व्हायचा. सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेने पाण्याने तुंडुंब भरल्याने गावकऱ्यांमध्ये अडिच दशकानंतर उत्साहाचे वातावरण निमार्ण झाले आहे. बंद पडलेल्या कुपनलीकांना व हातपंपाना नवसंजिवनी देण्याचे कार्य करून गावाला पाणी टंचाईपासुन मुक्त केले आहे.

- नंदकिशोर नारेवाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. सोनगव्हाणवासियांची तहान भागविण्यासाठी गावातील पाणी गावातच मुरावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सह विविध उपक्रम राबवून २५ वर्षापासूनची पाणी टंचाई सरपंच गोदारा यांनी दूर केली. त्यांच्या या उपक्रमाबाबत व ईतरही विविध गावातील योजनांबाबत पालकमंत्र्यांनीही त्यांचा गौरव केला हे विशेष! 

उन्हाळा म्हटले की डोळयासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे चित्र, ओस पडलेली माळ रानं आणि दुष्काळसदृष्य परिस्थितीत दुखरूपी आसवांच्या प्रवाहाने डोळयात वाहत असलेल्या कोरडया नद्यांचे प्रवाह आणि घोटभर पाण्यासाठी दूरवर वणवण फिरून माय माऊलीच्या पायात रूतलेल्या काटयाने बाहेर आलेला लहु हृदयाला हेलकावणी देतो, अशीच काहीसी अवस्था झाली होती ती वाशीम जिल्ह्यातील सोनगव्हाणवासियांची.  भौगोलिकदृष्टया  जरी हे गाव पैनगंगेच्या तिरावर वसलेले, परंतु हिवाळा संपताच त्या पैनगंगेचा प्रवाह दुषित व्हायचा, गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम अशा सर्वच जलस्त्रोतांनी हिवाळयातच तळ गाठला असताना पाण्यासांठी दिवस रात्र गावकऱ्यांची पायपीट व्हायची.  गत २५ वषार्पासुन पाणी टंचाईने कोरडे पडलेले सोनगव्हाण हे गाव कृतीशील आणि उपक्रमशील सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेने पाण्याने तुंडुंब भरल्याने गावकऱ्यांमध्ये अडिच दशकानंतर उत्साहाचे वातावरण निमार्ण झाले आहे. पाण्याअभावी होणारी गावकऱ्यांची वणवण थांबली आहे.

दरम्यान सरपंच शरद गोदारा यांनी २५ वषार्पासून गावातील बंद पडलेल्या कुपनलीकांना व हातपंपाना नवसंजिवनी देण्याचे कार्य करून गावाला पाणी टंचाईपासुन मुक्त केले आहे. पावसाचे पाणी वाया न घालवीत शोषशखड्डयाच्या मार्फत त्याचा निचरा करुन रेनवॉटर हार्वेस्टिंग या तंत्राचा वापर केल्यानेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढली व पारिणामत: अनेक वषार्पासुन बंद पडलेल्या कुपनलीकांना तुंडुब पाणी लागले .  पुर्वी गावात पाणी नसल्याने ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत होती. उन्हाळयात गावकरी स्थलांतरीत होऊन संपुर्ण गाव ओस पडायचा ,परंतु  दुष्काळसदृृष्य परिस्थितीतही योग्य उपाय योजना व कृतीची अमंलबजावणी केल्यानेच गाव पाणी टंचाईमुक्त झाला आहे असे गौरवोग्दार स्थानिक नागरिक काढीत असुन सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

 

गावातील पाण्याची समस्या पाहता बेचैन झालो होतो. गावातील पाणी टंचाई दूर कशी करता येईल यासाठी अनेकांची मते जाणून घेतली. स्वताहून रेनवॉटर हार्वेस्टिंगचा विचार डोक्यात आला. सफलता प्राप्त होवो अथवा न होवो करुन पाहले असता पाण्याच्या पातळीत मोठया प्रामणात वाढ झाली व गावातील पाणी टंचाई दूर झाली.

-शरद अशोक गोदारा, सरपंच गटग्रामपंचायत टनका 

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी