शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

२५ वर्षानंतर सोनगव्हाण गाव झाले पाणी टंचाईमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 13:41 IST

वाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले.

ठळक मुद्दे भौगोलिकदृष्टया  जरी हे गाव पैनगंगेच्या तिरावर वसलेले, परंतु हिवाळा संपताच त्या पैनगंगेचा प्रवाह दुषित व्हायचा. सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेने पाण्याने तुंडुंब भरल्याने गावकऱ्यांमध्ये अडिच दशकानंतर उत्साहाचे वातावरण निमार्ण झाले आहे. बंद पडलेल्या कुपनलीकांना व हातपंपाना नवसंजिवनी देण्याचे कार्य करून गावाला पाणी टंचाईपासुन मुक्त केले आहे.

- नंदकिशोर नारेवाशीम: गत २५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांचा त्रास पाहता सरपंचाने अभिनव संकल्पाव्दारे गाव पाणी टंचाईमुक्त केले व ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. सोनगव्हाणवासियांची तहान भागविण्यासाठी गावातील पाणी गावातच मुरावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सह विविध उपक्रम राबवून २५ वर्षापासूनची पाणी टंचाई सरपंच गोदारा यांनी दूर केली. त्यांच्या या उपक्रमाबाबत व ईतरही विविध गावातील योजनांबाबत पालकमंत्र्यांनीही त्यांचा गौरव केला हे विशेष! 

उन्हाळा म्हटले की डोळयासमोर उभे राहते ते भयान दुष्काळाचे चित्र, ओस पडलेली माळ रानं आणि दुष्काळसदृष्य परिस्थितीत दुखरूपी आसवांच्या प्रवाहाने डोळयात वाहत असलेल्या कोरडया नद्यांचे प्रवाह आणि घोटभर पाण्यासाठी दूरवर वणवण फिरून माय माऊलीच्या पायात रूतलेल्या काटयाने बाहेर आलेला लहु हृदयाला हेलकावणी देतो, अशीच काहीसी अवस्था झाली होती ती वाशीम जिल्ह्यातील सोनगव्हाणवासियांची.  भौगोलिकदृष्टया  जरी हे गाव पैनगंगेच्या तिरावर वसलेले, परंतु हिवाळा संपताच त्या पैनगंगेचा प्रवाह दुषित व्हायचा, गावकुसातील नैसर्गिक आणि कृत्रिम अशा सर्वच जलस्त्रोतांनी हिवाळयातच तळ गाठला असताना पाण्यासांठी दिवस रात्र गावकऱ्यांची पायपीट व्हायची.  गत २५ वषार्पासुन पाणी टंचाईने कोरडे पडलेले सोनगव्हाण हे गाव कृतीशील आणि उपक्रमशील सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेने पाण्याने तुंडुंब भरल्याने गावकऱ्यांमध्ये अडिच दशकानंतर उत्साहाचे वातावरण निमार्ण झाले आहे. पाण्याअभावी होणारी गावकऱ्यांची वणवण थांबली आहे.

दरम्यान सरपंच शरद गोदारा यांनी २५ वषार्पासून गावातील बंद पडलेल्या कुपनलीकांना व हातपंपाना नवसंजिवनी देण्याचे कार्य करून गावाला पाणी टंचाईपासुन मुक्त केले आहे. पावसाचे पाणी वाया न घालवीत शोषशखड्डयाच्या मार्फत त्याचा निचरा करुन रेनवॉटर हार्वेस्टिंग या तंत्राचा वापर केल्यानेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढली व पारिणामत: अनेक वषार्पासुन बंद पडलेल्या कुपनलीकांना तुंडुब पाणी लागले .  पुर्वी गावात पाणी नसल्याने ५ किमी अंतरावरून पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत होती. उन्हाळयात गावकरी स्थलांतरीत होऊन संपुर्ण गाव ओस पडायचा ,परंतु  दुष्काळसदृृष्य परिस्थितीतही योग्य उपाय योजना व कृतीची अमंलबजावणी केल्यानेच गाव पाणी टंचाईमुक्त झाला आहे असे गौरवोग्दार स्थानिक नागरिक काढीत असुन सरपंच शरद गोदारा यांच्या संकल्पनेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

 

गावातील पाण्याची समस्या पाहता बेचैन झालो होतो. गावातील पाणी टंचाई दूर कशी करता येईल यासाठी अनेकांची मते जाणून घेतली. स्वताहून रेनवॉटर हार्वेस्टिंगचा विचार डोक्यात आला. सफलता प्राप्त होवो अथवा न होवो करुन पाहले असता पाण्याच्या पातळीत मोठया प्रामणात वाढ झाली व गावातील पाणी टंचाई दूर झाली.

-शरद अशोक गोदारा, सरपंच गटग्रामपंचायत टनका 

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी