दुहेरी हत्याकांडातील आरोपींना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST2021-09-25T04:44:43+5:302021-09-25T04:44:43+5:30
वाशिम : मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ येथे १९ तारखेला गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर या दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना घडल्याने ...

दुहेरी हत्याकांडातील आरोपींना ठोकल्या बेड्या
वाशिम : मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ येथे १९ तारखेला गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर या दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आरोपी शोधण्यासाठी तीन वेगळे पथक तयार करून शोध सुरू केला असता, आरोपी दिलीप रत्ने याला मुंबई येथून, तर दुसरा आरोपी विकास राठोड याला डव्हा येथून अटक केली. यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का, याचा तपास सुरू आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी डव्हाजवळ असलेल्या चाकातीर्थ येथे मंदिरावर रखवालीसाठी असलेल्या गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर या वृद्ध दाम्पत्याची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली होती. त्यांच्याकडील तीन सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र व काही चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच जऊळका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून, यामध्ये आणखी काही आरोपी आढळतात का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.