शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राज्य सरकारवरील कर्ज फेडण्याची क्षमता वाढत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:14 AM

वाशिम  :  राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता  वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्‍वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत  बोलत होते.

ठळक मुद्देभाजपाचे प्रदेश प्रवक्ते पाठक पत्रकार परिषदेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता  वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्‍वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत  बोलत होते. तसेच जिल्हातील मालेगाव, वाशिम, रिसोड, मानोरा, कारंजा व मंगरुळपीर येथेही त्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जि .प. सदस्य शाम बढे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कृउबासचे संचालक गोपाल पाटील राऊत, कृउबासचे माजी उपसभापती प्रा आंनद देवळें, जिल्हा सरचिटणीस संदीप पिंपळकर यांच्यासह पदाधिाकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पाठक म्हणाले की,  राज्य शासनावर कर्जार्चा बोझा वाढला आहे. विकासकामांसाठी कर्ज काढावे लागते ते कर्ज फेडण्यासाठीची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. नोटांबंदीमुळे रियलक्ष्स्टेट मध्ये मंदी आलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे सरकारचे यश आहे. त्याचे चांगले परिणाम होणार आहेत. राज्यात फडणवीस शासनाने ३४  हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकर्‍यांसाठीच्या खर्चावर अर्थसंकल्पात वाढ केली. ३५ लाख टी. एम. सी. एवढी जलासाठ्यात वाढ झाली. १.५ लाख कृषी पंप जोडणी केल्या. राज्यात २१00 हवामान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विजेमध्ये राज्य स्वंयपूर्ण आहे. कृषीपंपाना सौर ऊर्जा पुरविण्यात येणार असूनख् राज्यात विदेशी गुंतवणूक वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. वाशिम येथे भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत  न. प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे व सरचिटणीस संदिप पिंपरकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मानोरा येथे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे तर मंगरुळपीर येथे भाजपा नेते सुरेश लुंगे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाची विदर्भ विकासासाठी समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या मागार्मुळे कृषी मालाला अतिशय कमी वेळात देशभर व परदेशात पोहचविता येणार आहे. समृद्धी महामागार्मुळे स्मार्ट सिटी ही संकल्पनाही पूर्णत्वास जाणार आहे. रात्रंदिवस नागरिकांच्या संरक्षणात असणार्‍या पोलिसांसाठीही अनेक योजना राबविल्या जात असून, त्यांच्या राहण्यासाठी घरे बांधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कौशल्यविकासा अंतर्गत ८ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या गेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी अडकलेली इंदू मिलची जागा मिळवून त्यामधील सर्व अडथळे या सरकारने दूर केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही मार्गी लागले आहे, असेही शेवटी विश्‍वास पाठक म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपा