अभय योजनेतून मिळणार वीज बिलात पाच टक्के सूट!

By Admin | Updated: November 7, 2016 02:46 IST2016-11-07T02:46:33+5:302016-11-07T02:46:33+5:30

व्याज व दंड १00 टक्के माफ; ३0 एप्रिल २0१७ पर्यंत योजना लागू.

Abhay scheme will get 5 percent electricity bill! | अभय योजनेतून मिळणार वीज बिलात पाच टक्के सूट!

अभय योजनेतून मिळणार वीज बिलात पाच टक्के सूट!

वाशिम, दि. ६- विजेची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महावितरणने अभय योजना अमलात आणली असून, मूळ बिलात पाच टक्के सूट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १00 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे.
वाढलेल्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ३१ मार्च २0१६ व त्याआधीच्या कृषी व पाणीपुरवठा वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्वांंसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
यांतर्गत योजना लागू झाल्यापासून एका महिन्याच्या आत जे ग्राहक योजनेचा फायदा घेऊन देयक अदा करतील, त्यांना मूळ थकबाकीच्या केवळ ९५ टक्केच रक्कम अदा करावी लागणार आहे. थकबाकीवर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड यामध्ये १00 टक्के सूट, तर मूळ थकबाकीमध्ये पाच टक्के सूट दिली जाणार आहे.
१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २0१७ या कालावधीमध्ये योजनेत सहभाग घेणार्‍या ग्राहकांना १00 टक्के दंड व व्याजापासून मुक्ती मिळणार आहे. १ फेब्रुवारी २0१७ ते ३0 एप्रिल २0१७ या कालावधीत योजनेत भाग घेणार्‍या ग्राहकांना व्याजातून ७५ टक्के सूट मिळणार असून, मूळ थकबाकी आणि योजनेत सहभागी होईपर्यंतच्या तारखेपर्यंंत लागणारे २५ टक्के व्याज भरावे लागणार आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांनी देयक अदा करून पूर्ववत वीजपुरवठा सुरू करावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

वाशिम जिल्हय़ात महावितरणचे एकंदरीत २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक आहेत. त्यात घरकुती ग्राहकांची संख्या १ लाख ५२ हजार ८८६ आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंंत या ग्राहकांपैकी थकबाकीदार ग्राहकांकडे १९.४५ कोटी रुपये थकबाकी होती. त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमधून मुक्ती मिळवायला हवी.
- अतुल देवकर, उपअभियंता, महावितरण, वाशिम

Web Title: Abhay scheme will get 5 percent electricity bill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.