शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य लोकांना 'आधार' नोंदणीसाठी त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:38 IST

Mangrulpir News शहरात असलेले आधार नोंदणी केंद्र हे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात हलविण्यात आले आहे.

मंगरुळपीर :  ० ते ५ वर्षे बालकांच्या आधार नोंदणीसाठी पोस्ट व बँकेत सेवा उपलब्ध करून देऊन बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे, तर शहरातील आधार नोंदणी केंद्रसुद्धा ग्रामीण भागात बालकांच्या आधार नोंदणीसाठी हलविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँक तसेच व्यवहारासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधार नोंदणी केंद्रावर लोक सकाळपासून रांगा लावतात; परंतु सध्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी पोस्ट ऑफिस व बँकेत व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र याठिकाणी अनेकदा तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी होत नाही. तर शहरात असलेले आधार नोंदणी केंद्र हे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात हलविण्यात आले आहे. त्यामुळे येथे केवळ अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी यांना आधार नोंदणीसाठी अडचण येत आहे. शहरातील आधार केंद्रावर नोंदणीसाठी येणारे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी हे केंद्र बंद असल्याने परत जात आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने शहरातील आधार नोंदणी केंद्र पूर्ववत सुरू करून नोंदणी केंद्राची संख्यासुद्धा वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरAdhar Cardआधार कार्ड