शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हराळमध्ये दरोडा; गळ्याला चाकू लावून लुटले!

By सचिन काकडे | Updated: May 3, 2024 19:38 IST

पहाटे ३ वाजताचा थरार : कुटुंबातील महिलेस मारहाण

वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे ३ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एका घरावर धाडसी दरोडा घातला. गळ्याला चाकू लावून ६५ वर्षीय महिलेस लुटण्यासह कुटूंबातील अन्य एका महिलेस मारहाण करून ६० हजार रुपये किंमतीचे सोने-चांदिचे दागिने घेवून चोरट्यांनी तेथून पोबारा केला. या घटनेमुळे हराळ येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोभा मधुकर कळासरे (६०) यांनी रिसोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ३ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास झोपेत असताना आवाज आल्याने उठून पाहिले असता, तीन अनोळखी इसम समोर उभे असल्याचे दिसले. त्यातील एकाने जवळ येत आरडाओरड केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच गळ्याला चाकू लावून ३० तोळे वजनाच्या चांदीच्या पाटल्या काढून घेतल्या. त्यानंतर हाॅलमध्ये झोपून असलेली लहान सून पुजा कळासरे हिला त्यांनी मारहाण करून कपाटातील ६० हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून पोबारा केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर भादंविचे कलम ३९२, ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. श्वान पथकास पाचारण करून पोलिसांकडून घटनास्थळ व परिसरात तपासकार्य राबविण्यात आले. मात्र, फार काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली.

टॅग्स :washimवाशिम