शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसावर आटोपल्या ५० टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:04 IST

अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सरासरी १५८.५२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र तुलनेने उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे हे प्रमाण केवळ ९१.३६ मिलीमिटर असून लघू आणि मध्यम अशा १३४ पैकी शंभरावर सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. दुसरीकडे अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ ते २९ जून या कालावधीत ही सरासरी १५८.५२ मिलीमिटर असते. यंदा मात्र चालू महिन्यात वाशिम तालुक्यात १००.७६, मालेगाव ९३.५६, रिसोड ८८.३, मंगरूळपीर ९१.८५, मानोरा ६९.७० आणि कारंजा तालुक्यात १०४.२३ असा सरासरी ९१.३६ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे. त्याची टक्केवारी ११.४४ असून पावसाच्या पहिल्याच महिन्यात पर्जन्यमान ६७ मिलीमिटरने घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नदी-नाले, विहिरी, कुपनलिका, हातपंपांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत वाढ झाली नसून ३ मध्यम व १३१ लघू अशा एकंदरित १३४ सिंचन प्रकल्पांपैकी शंभरावर प्रकल्प आजही कोरडेच आहेत.दरम्यान, जमिनीत किमान ९ ते १० इंचाची ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या पेरणीची घाई करू नये; अन्यथा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता उद्भवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला होता; मात्र पावसाळ्यास आधीच उशिर झाल्याने आणि पावसाचा जोर वाढल्यास पेरणीची कामे शक्य होणार नसल्याने पहिल्या एक-दोन पावसातच सुमारे ५० टक्के शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. त्यास कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळाला. दरम्यान, हा निर्णय बहुतांशी गावांमध्ये सद्यातरी योग्य ठरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी