शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसावर आटोपल्या ५० टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:04 IST

अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सरासरी १५८.५२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र तुलनेने उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे हे प्रमाण केवळ ९१.३६ मिलीमिटर असून लघू आणि मध्यम अशा १३४ पैकी शंभरावर सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. दुसरीकडे अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ ते २९ जून या कालावधीत ही सरासरी १५८.५२ मिलीमिटर असते. यंदा मात्र चालू महिन्यात वाशिम तालुक्यात १००.७६, मालेगाव ९३.५६, रिसोड ८८.३, मंगरूळपीर ९१.८५, मानोरा ६९.७० आणि कारंजा तालुक्यात १०४.२३ असा सरासरी ९१.३६ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे. त्याची टक्केवारी ११.४४ असून पावसाच्या पहिल्याच महिन्यात पर्जन्यमान ६७ मिलीमिटरने घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नदी-नाले, विहिरी, कुपनलिका, हातपंपांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत वाढ झाली नसून ३ मध्यम व १३१ लघू अशा एकंदरित १३४ सिंचन प्रकल्पांपैकी शंभरावर प्रकल्प आजही कोरडेच आहेत.दरम्यान, जमिनीत किमान ९ ते १० इंचाची ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या पेरणीची घाई करू नये; अन्यथा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता उद्भवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला होता; मात्र पावसाळ्यास आधीच उशिर झाल्याने आणि पावसाचा जोर वाढल्यास पेरणीची कामे शक्य होणार नसल्याने पहिल्या एक-दोन पावसातच सुमारे ५० टक्के शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. त्यास कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळाला. दरम्यान, हा निर्णय बहुतांशी गावांमध्ये सद्यातरी योग्य ठरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी