शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसावर आटोपल्या ५० टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:04 IST

अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सरासरी १५८.५२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र तुलनेने उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे हे प्रमाण केवळ ९१.३६ मिलीमिटर असून लघू आणि मध्यम अशा १३४ पैकी शंभरावर सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. दुसरीकडे अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ ते २९ जून या कालावधीत ही सरासरी १५८.५२ मिलीमिटर असते. यंदा मात्र चालू महिन्यात वाशिम तालुक्यात १००.७६, मालेगाव ९३.५६, रिसोड ८८.३, मंगरूळपीर ९१.८५, मानोरा ६९.७० आणि कारंजा तालुक्यात १०४.२३ असा सरासरी ९१.३६ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे. त्याची टक्केवारी ११.४४ असून पावसाच्या पहिल्याच महिन्यात पर्जन्यमान ६७ मिलीमिटरने घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नदी-नाले, विहिरी, कुपनलिका, हातपंपांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत वाढ झाली नसून ३ मध्यम व १३१ लघू अशा एकंदरित १३४ सिंचन प्रकल्पांपैकी शंभरावर प्रकल्प आजही कोरडेच आहेत.दरम्यान, जमिनीत किमान ९ ते १० इंचाची ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या पेरणीची घाई करू नये; अन्यथा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता उद्भवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला होता; मात्र पावसाळ्यास आधीच उशिर झाल्याने आणि पावसाचा जोर वाढल्यास पेरणीची कामे शक्य होणार नसल्याने पहिल्या एक-दोन पावसातच सुमारे ५० टक्के शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. त्यास कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळाला. दरम्यान, हा निर्णय बहुतांशी गावांमध्ये सद्यातरी योग्य ठरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी