शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

वाशिमच्या जंगलात ४० कृत्रिम पाणवठे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 5:51 PM

वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव संकटात येत असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाच्यावतीने जिल्हाभरातील जंगलात प्राथमिक टप्प्यात ४० कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात हे पाणवठे जंगलात विविध ठिकाणी ठेवण्यात येतील.वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचा भाग मोठा आहे. या जंगलात विविध प्रजातींच्या हजारो प्राण्यांचा अधिवास आहे. तथापि, या जंगलात पुरेशा प्रमाणात पाणीसाठे नसल्याने हिवाळ्यापासूनच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हे प्राणी सुरुवातीला शेतशिवारात आणि नंतर उन्हाळ्यात थेट लोकवस्तीपर्यंत धाव घेतात. पाण्यासाठी होत असलेली वन्यप्राण्यांची भटकंती त्यांच्या जिवाला धोका निर्माण करते. कधी वाहनांची धडक लागून, तर कधी मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागला. हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, यावर नियंत्रणासाठी वनविभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्याची तयारी केली आहे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद पूर्वीच झाली असून, सिमेंटचे हे पाणवठे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण पाच फुट लांब रुंद आणि दोन फुट खोल, तसेच चार फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल अशा आकाराचे हे पाणवठे जंगलातील आवश्यक ठिकाणी ठेवले जाणार असून, त्यात पाणी भरण्याची काळजी घेण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी जंगलात कृत्रिम पाणवठे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक टप्प्यात ४० पाणवठे तयार करण्यात येत असून, त्याशिवाय पुढील काळात इतरही आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.-सुमंत सोळंके उपवनसंरक्षकवाईल्ड लाईफ (वाशिम)

टॅग्स :washimवाशिमforestजंगलforest departmentवनविभाग