शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयातील ३३७ पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:07 IST

१४२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता तब्बल ३३७ पाणी नमुने दूषित असल्याचे सिध्द झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या वतीने पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर जिल्हाभरातील १५२४ पाणी नमुने संकलित करुन पाणी तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविले. यातील १४२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता तब्बल ३३७ पाणी नमुने दूषित असल्याचे सिध्द झाले. त्यापैकी ३२५ पाणी नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक आढळले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्याच्या सुचना भुजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने दिल्या आहेत .जिल्हा परिषदेच्यावतीने पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर जिल्हाभरातील १५२४ पाणी नमुने संकलित केले. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील १५६, रिसोड तालुक्यातील १३२, मालेगाव तालुक्यातील ५३, मंगरुळपीर तालुक्यातील ४०७, कारंजा तालुक्यातील ४२० आणि मानोरा तालुक्यातील ३५६ नमुन्यांचा समावेश होता. यातील १४२४ नमुन्यांची जिल्हा प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील १५६ पैकी २४, रिसोड तालुक्यातील १३२ पैकी १८, मालेगाव तालुक्यातील ५३ पैकी ३, मंगरुळपीर तालुक्यातील ४०७ पैकी ७४, कारंजा तालुक्यातील ४२० पैकी १३२ आणि मानोरा तालुक्यातील ३५६ पैकी ८६ नमुने दूषित असल्याचे आढळले आहे. दूषित आढळलेल्या एकूण १४२७ नमुन्यापैकी ३२५ नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण आवश्यक ते पेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. त्याशिवाय दूषित ४ नमुन्यांत फ्लोराईड, १३ नमुन्यांत टीडीएस आणि एका नमुन्यात अल्काचे प्रमाणही आढळले आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेच्या प्रयोग शाळेकडून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले असून, संबंधित जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्याबाबत आवश्यक उपाय योजना करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.(प्रतिनिधी)नायट्रेटचे वाढते प्रमाण चिंताजनकजिल्ह्यातील शेती व्यवसायासाठी रासायनिक खतांचा वापर काही वर्षांत भरमसाठ वाढला असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पाण्याच्या स्रोतात नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अशा स्रोतांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने त्याचा दुष्परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. उघड्यावरील गटारी व शेतात पिकांवर फवारणाºया रासायनिक औषधांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याचे तपासणीत समोर आले.पिण्याच्या पाण्यात भारतीय मानकानुसर नायट्रेटच्या सहनशील प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात ३२५ नमुन्यांत नायट्रेट आढळले आहे. त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

- एस. एस. कडूवरिष्ठ भुवैज्ञानिकभुजल सर्वेक्षण आणि विकास संस्था.पिण्याच्या पाण्यात नायट्रेट असायलाच नको; परंतु या घटकद्रव्याचे प्रमाण पाण्यात आढळते. त्याचे प्रमाण निर्धारित आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात नायट्रेट असल्यास मेंदूचे गंभीर आजार बळावतात.- डॉ. निलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ, कारंजा लाड

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी