शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली

By दादाराव गायकवाड | Updated: September 8, 2022 18:44 IST

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. 

जऊळका (वाशिम) : सोयाबीनची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला आग लागल्याने २५० क्विंटल सोयाबीनसह ट्रक जळून खाक झाला आहे. त्यामुळे १५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरी वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. 

औरंगाबाद- नागपूर महामार्गावर जऊळका नजिक ७ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एमएच ४०, बीएल ९३९२ क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन नागपूर येथून औरंगाबादकडे जात होता. हा ट्रक मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक पोहोचला असता ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉटसर्किट होऊन ट्रकला अचानक आग लागली.

दरम्यान, आगीत २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. हा ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शे. राजिक शे.रज्जाक रा.लोणार जी. बुलढाणा यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी जऊळका पोलिसांनी सुरळीत केली.

 

 

टॅग्स :washimवाशिमfireआगAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर