शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली

By दादाराव गायकवाड | Updated: September 8, 2022 18:44 IST

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. 

जऊळका (वाशिम) : सोयाबीनची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला आग लागल्याने २५० क्विंटल सोयाबीनसह ट्रक जळून खाक झाला आहे. त्यामुळे १५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरी वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. 

औरंगाबाद- नागपूर महामार्गावर जऊळका नजिक ७ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एमएच ४०, बीएल ९३९२ क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन नागपूर येथून औरंगाबादकडे जात होता. हा ट्रक मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक पोहोचला असता ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉटसर्किट होऊन ट्रकला अचानक आग लागली.

दरम्यान, आगीत २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. हा ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शे. राजिक शे.रज्जाक रा.लोणार जी. बुलढाणा यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी जऊळका पोलिसांनी सुरळीत केली.

 

 

टॅग्स :washimवाशिमfireआगAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर