शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली

By दादाराव गायकवाड | Updated: September 8, 2022 18:44 IST

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. 

जऊळका (वाशिम) : सोयाबीनची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला आग लागल्याने २५० क्विंटल सोयाबीनसह ट्रक जळून खाक झाला आहे. त्यामुळे १५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरी वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. 

औरंगाबाद- नागपूर महामार्गावर जऊळका नजिक ७ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एमएच ४०, बीएल ९३९२ क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन नागपूर येथून औरंगाबादकडे जात होता. हा ट्रक मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक पोहोचला असता ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉटसर्किट होऊन ट्रकला अचानक आग लागली.

दरम्यान, आगीत २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. हा ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शे. राजिक शे.रज्जाक रा.लोणार जी. बुलढाणा यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी जऊळका पोलिसांनी सुरळीत केली.

 

 

टॅग्स :washimवाशिमfireआगAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर