२५ नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

By Admin | Updated: May 16, 2016 01:22 IST2016-05-16T01:22:57+5:302016-05-16T01:22:57+5:30

३२.५३ कोटींची तरतूद : वाशिम तालुक्यासाठी सर्वाधिक निधी, मानोरा तालुक्याच्या नशिबी ‘उपेक्षा’च!

25 new water supply schemes sanctioned | २५ नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

२५ नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

वाशिम : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणार्‍या 'मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम' या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला आहे. २५ नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाने तब्बल ३२ कोटी ५३ लाख १७ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील सर्वाधिक आठ योजनांवर १४.६१ कोटी, तर सर्वात कमी मानोरा तालुक्यातील केवळ एका योजनेसाठी ८५.६0 लाखांची तरतूद आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध योजनांच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरीवरील योजना, या सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तथापि, भूजलाची घटती पातळी, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणांमुळे ग्रामीण पाणीपुरवठय़ावर प्रचंड ताण येत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनामार्फत २00९-१0 मध्ये वर्धित वेग ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे करण्यात आले. भारत निर्माण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १0 एप्रिल २00९ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत समप्रमाणात ५0:५0 टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो. आता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात सन २0१६-१७ ते २0१९-२0 या चार वर्षांंसाठी ह्यमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमह्ण राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या गावांची नावे राज्य शासनाने ७ मे रोजी जाहीर केली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश आहे. यासाठी तब्बल ३२.५३ कोटींची तरतूद केली आहे. वाशिम तालुक्यातील आठ योजनांसाठी १४ कोटी ६१ लाख ४0 हजार रुपये, मंगरुळपीर सहा योजनांसाठी ५ कोटी ९३ लाख रुपये, रिसोड चार योजनांसाठी ४ कोटी ४९ लाख १७ हजार रुपये, मालेगाव तीन योजनांसाठी ३ कोटी ७१ लाख रुपये, कारंजा तीन योजनांसाठी २ कोटी ९३ लाख रुपये, तर मानोरा तालुक्यातील एका योजनेसाठी ८५ लाख ६0 रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: 25 new water supply schemes sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.